आहार

मोग्गलान नावाच्या व्यक्तीला भगवान बुद्ध सांगतात की ते श्रमणाला  क्रमाक्रमाने एकेक पाठ देत टप्प्याटप्प्याने  क्रमिक शिक्षण देतात. सराव करून पुढील पाठ घेत घेत अंतिमतः श्रमणांना मनोनिग्रह साधणे शक्य होते. यातील एका टप्प्यावर तथागत श्रमणांना अन्नभक्षणाचा निग्रह शिकवतात:

तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ देतात. बंधू, शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणिवेने स्वतःला संयमित कर. दुसरा पाठ देतात कि डोळ्याने वस्तू पाहिल्याने किंवा इतर इंद्रियांनी जाणवणाऱ्या तपशिलाने भारावून जाऊ नकोस; जसे आवाज, वास, रुची, स्पर्श यामुळे मोहून जाऊ नकोस. यानंतर ते श्रमणाला पुढील पाठ देतात:
''श्रमणा, ये. हात राखून खात जा. खाताना चित्त सावध राहू दे. केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर-सौष्ठव राखण्यासाठी खाऊ नकोस. तर स्वास्थ्य व शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे पोषण व्हावे, तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्न भक्षण करावे. जेवत असताना मनात सतत हा विचार असावा कि, 'मी माझ्या वेदनांचा (feelings) निग्रह करीत आहे. नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही. माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल.'' 

(Be moderate in eating; earnest and heedful do you take your food. Not for sport, not for indulgence, not for adding personal charm to the body; but do it for body stabilising, for its support, for protection from harm and for keeping up the practice of the righteous life; with this thought: ''I check my former feeling. I will not give rise to another feeling. Maintenance and comfort may be mine.'')

(संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म )

विचारांवर काळजीपूर्वक नियंत्रण

नव्यानेच श्रमण झालेल्या अनुयायांसोबत तथागत विहाराकडे जात होते. त्याचवेळी जोरात पाऊस सुरु झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका घरात त्यांनी प्रवेश केला; पण घराचे छत गळत होते आणि तिथे पावसापासून संरक्षण मिळणे शक्य नव्हते. तेव्हा बुद्ध त्या श्रमणांना म्हणाले, ''ज्याप्रमाणे घराचे छप्पर नीट शाबूत नसल्याने पावसाचे पाणी घरात येते व घराचे नुकसान करते, त्याप्रमाणे ज्या वेळी आपले आपल्या विचारांवर काळजीपूर्वक नियंत्रण नसते, त्यावेळी वासना व वाईट विकार आपल्या सर्व चांगल्या संकल्पनांना पोखरून काढतात.''

ते पुढे म्हणाले, ''परंतु ज्या वेळी छत मजबूत असते, त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही; त्याचप्रमाणे आपल्या चित्तवृत्तींवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक आचरण केले तर वासना/ नुकसानकारक विचार निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाहीत.'' 

( 'Controlling one's thoughts' and 'acting with reflection' to prevent desires from arising and disturbing us)

Ref: Buddha and His Dhamma, Dr B.R.Ambedkar


आपले काम मनापासून करा

(बुद्धांनी अनाथपिंडिकास केलेला उपदेश: अनाथपिंडिक सुदत्ताने बुद्धांना विचारले की, "माझी संपत्ती, माझे घर, माझा व्यापार-उदीम यांचा मी त्याग केलाच पाहिजे काय? आणि धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय?" त्यावर बुद्धांनी त्याला जो उपदेश केला त्याचा हा भाग आहे. )
****************************************************************
परिश्रम करा. 
उद्यमशील, उत्साही व कार्यरत रहा
*
तुमच्या उपजीविकेचे जे काही कार्य असेल, जो व्यवसाय तुम्ही करता त्यात तुम्ही कार्यरत रहा आणि परिश्रमपूर्वक स्वतःला आपल्या व्यवसायकार्यात वाहून घ्या. जीवन, संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाही तर संपत्तीला चिकटून राहण्याची प्रवृत्ती आणि जीवन, सत्ता व संपत्तीची आसक्ती माणसाला गुलाम करते. 

आळसाचे जीवन घृणास्पद होय. निष्क्रियतेचा तिरस्कारच केला पाहिजे. 

लोक काहीही करोत, कारागीर, व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत, किंवा संसारत्याग करून धार्मिक चिंतनात/ध्यान करण्यात ते आपले आयुष्य घालवोत; मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे. त्यांनी मेहनती आणि उत्साही असले पाहिजे. 

पाण्यात वाढणाऱ्या परंतू पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील; जीवनसंघर्षात कोणाचाही हेवा किंवा द्वेष करीत नसतील आणि या जगात ते स्वार्थाचे नव्हे तर परमार्थाचे जीवन जगत असतील, तर आनंद, शांती, आणि समाधान खात्रीने त्यांच्या मनात वास करतील. 

उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो. जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग तो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना व सहकाऱ्यांना वरदान ठरतो. 

****************************************************************

(संदर्भ: बुद्ध आणि त्यांचा धम्म )

मित्र आणि मैत्री - १

"अस्थिर जीवन हे वाळूत उभ्या असलेल्या वृक्षाप्रमाणे असते, हे ओळखून शहाणा मनुष्य, अस्थिर मनाच्या आपल्या मित्रात बदल घडवून आणण्याचा आणि अस्थिर मनाच्या मित्राला अशुद्धतेकडून सद्गुणाकडे (पावित्र्याकडे) परत आणायचा हरप्रकारे प्रयत्न करतो."   
----गौतम बुद्ध  

बुद्ध आणि त्यांचा धम्म 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
खंड दुसरा, भाग आठवा 

***************************************************

"The wise man, knowing the character of instability, like a tree in the midst of sand (uses every effort) to change his friend whose mind is unfixed and to bring him back from impurity to virtue (purity)" 
--- Gautam Buddha

Buddha and His Dhamma
- Dr  B. R. Ambedkar
Book II, Part VIII

***************************************************

बुद्धांचा धम्म कसा आहे?

      तथागत गौतम बुद्ध आपल्या पहिल्या प्रवचनात सांगतात:
  • "माझ्या धम्मात मानवी जीवनाचा उद्देश आणि आशा या दोन्ही गोष्टी आहेत."
  • "My Dhamma has in it both Hope and Purpose." - Tathagat Gautam Buddha
   ***************************************************

  • तथागतांचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे,  आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

  • His Doctrine is the doctrine of righteousness and his aim is to establish the kingdom of Righteousness on earth.

   ***************************************************
  • बुद्धांचा धम्म म्हणजे सत्य, संपूर्ण सत्य, सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे.
  • His doctrine is the truth, the whole truth, and nothing but the truth

   ***************************************************
  • तथागत बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की, जे परित्यक्त अथवा अनाथ आहेत त्यांना आपलेसे करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते. जे अधःपतित आहेत त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते. आणि जे पददलित आहेत त्यांना प्रगतीपथावर नेणारा समतेचा प्रकाश त्यांच्या वाटा उजळून टाकतो.
  • In his doctrine there is love to create a longing to own those who are disowned or unowned; to the degraded, there is the ennoblement ever present to raise them; to the disinherited and the downtrodden, there is equality blazing forth their path to advancement.
   ***************************************************


बुद्ध आणि त्यांचा धम्म - ले. डॉ. बी. आर. आंबेडकर
दुसरा खंड, भाग पहिला

From
Buddha and His Dhamma – by Dr. B. R. Ambedkar
Book-II, Part I

सज्जनांची संगत

           एकदा तथागत बुद्ध श्रमण भिक्खुंसोबत रस्त्याने जात असताना एक सुगंधीत वेष्टन जमिनीवर पडलेले त्यांना दिसले. थोडे दूर चालून गेल्यावर पुढे त्यांना मृत माशाचा तुकडा पडलेला दिसला. या दोन्ही वस्तूंकडे तथागतांनी भिक्खूंचे लक्ष वेधले. सुगंधी पदार्थाला स्पर्श झालेल्या वेष्टनाचा सुगंध आणि मृत माशाच्या तुकड्याचा दुर्गंध या दोन गोष्टीतून आपल्याला काय सत्य शिकायला मिळाले हा विचार ते भिक्खू करत असतानाच तथागत भगवान बुद्ध पुढील गाथा ऐकवतात:

  • १. जो क्षुद्र मनोवृत्तीच्या किंवा नीच प्रवृत्तीच्या माणसाची संगत करतो; त्याची स्थिती दुर्गंधीयुक्त पदार्थ हातात धरणाऱ्या व त्यामुळे स्वतः दुर्गंधीत होणाऱ्या माणसासारखी होते. तो अधिकाधिक वाईट बनत जातो आणि कोणतेही कारण नसताना दुष्टपणात तरबेज होतो. 
  • २. परंतु ज्याप्रमाणे सुगंधी द्रव्य हातात घेणाऱ्याचा देहही सुगंधीत होतो; त्याप्रमाणे सज्जनांची संगत धरणारा शहाणा मनुष्यही अधिक प्रगत होतो. तो उत्तरोत्तर अधिक ज्ञानी, शीलवान व गुणवान होतो. त्याला या गुणांत पूर्णत्व लाभून त्याला संतोष प्राप्त होतो.

संदर्भ: 
बुद्ध आणि त्यांचा धम्म - लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर 
द्वितीय खंड, भाग पाचवा 

एतं बुद्धान सासनं

सब्ब पापस्स अकरणं, 
कुसलस्स उपसंपदा ।
सचित्त परियोदपनं, 
एतं बुद्धान सासनं ।।
--------------------------------------------------
अर्थ:
कोणतेही पाप, (अनीती) अकुशल कर्म न करणे
कुशल कर्मांचा संचय करणे (पुण्य संपादणें)
आणि आपल्या मनाला सन्मार्गावर लावणे,
हीच बुद्धांची शिकवण आहे.
--------------------------------------------------
Keep away (abstain) from all evils and immoral,
Keep doing good and being moral,
Purify one's own mind,  
This is the Teaching of the Buddha
--------------------------------------------------
Learn Pali Words:
Sr.
No.
पाली
English

मराठी
हिंदी
1
सब्ब
All
सर्व
सभी

2
पाप
wrongdoing,
evil action
चुकीचे कार्य,
दुष्टपणा, वाईट कार्य
बुरे काम
3
कुसल
good action;
merit; virtue
चांगले काम,
सत्कर्म, सद्गुण
अच्छे काम
4
सचित्त
one's own mind.
स्वतःचे मन
अपना मन
5
सासनं
teaching; message; the doctrine
शिकवण,
संदेश
संदेश, शिक्षा, सिद्धांत

द्वेषाने द्वेष शांत होत नाही

न ही वेरेन वेरानीसम्मंतीध कुदाचनं | 
अवेरेन च सम्मन्तिएस धम्मो सनन्तनो ||
अर्थ :       
या जगात द्वेषाने द्वेष कधीच शांत होत नाही.
मैत्रीभाव, क्षमाशीलता व समजूतदारपणानेच क्रोध व द्वेष शांत होतो.
हा येथील अनंत काळाचा नियम आहे.

Hatred is indeed, never appeased by hatred in this world.
It is appeased only by loving-kindness(absence of hatred).
This is an ancient law.
अवेरं = Friendliness; mildness; kindness
वेरं = Wrath; anger; hatred; sin