विचारांवर काळजीपूर्वक नियंत्रण

नव्यानेच श्रमण झालेल्या अनुयायांसोबत तथागत विहाराकडे जात होते. त्याचवेळी जोरात पाऊस सुरु झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका घरात त्यांनी प्रवेश केला; पण घराचे छत गळत होते आणि तिथे पावसापासून संरक्षण मिळणे शक्य नव्हते. तेव्हा बुद्ध त्या श्रमणांना म्हणाले, ''ज्याप्रमाणे घराचे छप्पर नीट शाबूत नसल्याने पावसाचे पाणी घरात येते व घराचे नुकसान करते, त्याप्रमाणे ज्या वेळी आपले आपल्या विचारांवर काळजीपूर्वक नियंत्रण नसते, त्यावेळी वासना व वाईट विकार आपल्या सर्व चांगल्या संकल्पनांना पोखरून काढतात.''

ते पुढे म्हणाले, ''परंतु ज्या वेळी छत मजबूत असते, त्यावेळी त्यातून पाणी गळत नाही; त्याचप्रमाणे आपल्या चित्तवृत्तींवर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक आचरण केले तर वासना/ नुकसानकारक विचार निर्माण होत नाहीत किंवा आपल्याला विचलित करू शकत नाहीत.'' 

( 'Controlling one's thoughts' and 'acting with reflection' to prevent desires from arising and disturbing us)

Ref: Buddha and His Dhamma, Dr B.R.Ambedkar


No comments:

Post a Comment