दारिद्र्यात धन्यता मानू नका


1) दारिद्र्यात धन्यता मानावी असे तथागतांनी कधीही सांगितले नाही व दारिद्र्याचा गौरव केला नाही.

2) त्याप्रमाणेच दरिद्री माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधीच शिकविले नाही.

3) उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असेच तथागत गौतम बुद्ध म्हणतात. एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि तो म्हणजे संपत्ती ही विनयशासित असली पाहिजे. (acquisition of riches must be subject to Vinaya.)

~डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

No comments:

Post a Comment