पोस्ट नं 94

📚 पोस्ट नं 94 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग दुसरा- परिव्राजकांची धम्मदीक्षा
Conversion of Parivrajakas
🌷7. परिव्राजकांची प्रतिक्रिया 🌷
The Response of the Parivrajakas
*************************

1) हा खरोखरच एक नवीन धम्म आहे याची त्या पाच परिव्राजकांना ताबडतोब जाणीव झाली. जीवनाच्या प्रश्नाकडे पाहण्याच्या या नव्या दृष्टीचा (new approach) त्यांच्यावर इतका परिणाम झाला की ते एकमताने म्हणाले: "जगाच्या इतिहासात आजपर्यंत 'मानवी दुःखाचे अस्तित्व ओळखणे हाच धर्माचा खरा पाया आहे' हे कोणत्याही धर्मसंस्थापकाने सांगितलेले नाही."

2) "जगाच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही धर्मसंस्थापकाने हे सांगितले नाही की, हे मानवी दुःख दूर करणे हाच धर्माचा खरा उद्देश आहे."

3) "जगाच्या इतिहासात यापूर्वी मूलतःच इतका सरळ आणि साधा; अद्भुतता आणि अतिमानवी शक्तीपासून इतका मुक्त, आत्मा, ईश्वर आणि मरणोत्तर जीवन यावरील श्रद्धेपासून इतका स्वतंत्र, इतकेच नव्हे तर अशा श्रद्धेला विरोध असणारा मुक्तीचा मार्ग कधीही पुढे मांडण्यात आला नाही."

4) "जगाच्या इतिहासात यापूर्वी कुणीही अशा धर्माची योजना पुढे मांडली नाही की, ज्यामध्ये दैवी साक्षात्काराला थारा नाही आणि ज्याच्या आज्ञा ह्या ईश्वराच्या आज्ञा नसून त्या माणसाच्या सामाजिक गरजांच्या चिकित्सेपोटी (commands are born of the examination of the social needs of man) निर्माण झालेल्या आहेत."

5) "जगाच्या इतिहासात मुक्ती (salvation, मोक्ष) हे असे सुखाचे वरदान आहे की, जे माणसाने स्वप्रयत्नाने व सदाचाराने वागून याच जन्मात आणि याच पृथ्वीतलावर राहून प्राप्त करावयाचे असते; हा मोक्षाचा अर्थ यापूर्वी कुणीही सांगितला नाही."

6) बुद्धांच्या नव्या धम्माचे प्रवचन ऐकल्यावर परिव्राजकांनी अशा भावना व्यक्त केल्या.

7) जो अत्युच्च नैतिक भावनेने प्रेरित झालेला आहे आणि तो आपल्या काळातील बौद्धिक ज्ञानात तज्ज्ञ आहे, जो एक नव्या विचारांचा प्रणेता आहे, याच जगात, याच जीवनात आत्मविकास व आत्मसंयमन यांच्या योगाने झालेल्या आंतरिक ह्रदयपरिवर्तनाने मुक्ती मिळू शकते हे आपले तत्व, विरोधी मतांची जाणीव असून जाणूनबुजून पुढे मांडण्याचे ज्याच्यात धैर्य आहे, अशा बुद्धांच्या रुपाने एक समाजसुधारक (reformer) लाभला आहे असे त्यांना वाटले.

8) तथागतांविषयी त्यांचा आदर इतका अमर्याद झाला की ते पाच परिव्राजक त्यांना ताबडतोब शरण गेले आणि आपले शिष्य म्हणून आपला स्वीकार करावा अशी त्यांनी बुद्धांना विनंती केली.

9) "एहि भिक्खवे" (भिक्खुंनो या) हे शब्द उच्चारुन बुद्धांनी त्यांना आपल्या धम्मात प्रविष्ट करुन घेतले. ते "पंचवर्गीय भिक्खू" म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले.

*****************************
(द्वितीय खंड-भाग दुसरा समाप्त)
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷

No comments:

Post a Comment