पोस्ट नं 92

📚 पोस्ट नं 92 📖
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग दुसरा- परिव्राजकांची धम्मदीक्षा
Conversion of Parivrajakas
🌷6. बुद्धांचे पहिले प्रवचन (अंतिम भाग) 🌷
The Buddha's First Sermon (concluded)
*************************

1) बुद्धांनी आपला धम्म आणि त्यातील विषय समजावून सांगितल्यावर परिव्राजकांना विचारले,

2) "व्यक्तीगत शुद्धी हा जगातील चांगल्या गोष्टींचा पाया नाही काय?" त्यांनी उत्तर दिले, "आपण म्हणता ते खरोखर आहे."

3) नंतर तथागत बुद्धांनी विचारले, "लोभ, क्रोध, अज्ञान, प्राणहत्या, चोरी, व्यभिचार आणि खोटे बोलणे यामुळे व्यक्तीगत शुद्धीचा पाया ढासळत नाही काय? या वाईट गोष्टींवर ताबा ठेवता यावा म्हणून व्यक्तीगत शुद्धीकरिता चारित्र्याचे सामर्थ्य वाढविणे आवश्यक नाही काय? माणसामध्ये जर व्यक्तीगत शुद्धी नसेल तर तो चांगल्या गोष्टी करण्यास साधनभूत कसा होऊ शकेल? आणि परिव्राजकांनी उत्तर दिले, "आपण म्हणता तसेच आहे."

4) "आणखी असे की, दुसऱ्यांना गुलाम करण्यात किंवा त्यांच्यावर सत्ता गाजविण्यात लोकांना हरकत का वाटत नाही? दुसऱ्याचे जीवन दुःखी करण्यात त्यांना काहीच का वाटत नाही? माणसे एकमेकांशी सदाचाराने वागत नाहीत हेच त्याचे कारण नव्हे काय?" आणि परिव्राजक उत्तरले, "बरोबर आहे."

5) "जर प्रत्येकाने अष्टांग मार्गाचा- सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मान्त, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी यांचा; थोडक्यात सदाचार मार्गाचा अवलंब केला तर एक माणूस दुसऱ्या माणसावर करीत असलेला अन्याय आणि अमानुषपणा दूर होणार नाही काय?" त्यावर ते म्हणाले, "होय."

6) "शील किंवा सद्गुणाच्या मार्गाचा उल्लेख करुन बुद्धांनी विचारले, "गरजू आणि गरीब लोकांचे दुःख नाहीसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक नाही काय? जेथे दारिद्र्य आणि दुःख आहे तेथे लक्ष पुरवून ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक नाही काय? निःस्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची (Nekkhamma) आवश्यकता नाही काय? वैयक्तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक नाही काय?"

7) "माणसावर प्रेम करणे आवश्यक नाही काय?" आणि ते म्हणाले, "होय."

8) "याच्याही पुढे जाऊन मी म्हणतो, केवळ प्रेम करणे पुरेसे नाही. खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ मानवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणीमात्रांविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा अर्थ आहे. ती मानवापुरती मर्यादित नाही. अशा प्रकारची मैत्री आवश्यक नाही काय? आपले मन निःपक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. म्हणून आपणा स्वतःला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणीमात्रांना मैत्रीखेरीज दुसऱ्या कशाने मिळू शकेल?"

9) ते सर्व म्हणाले, "होय."

10) "परंतु या सर्व सद्गुणांच्या आचरणास प्रज्ञेची-बुद्धीची- जोड दिली पाहिजे." (intelligence)

🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
६. बुद्धांचे पहिले प्रवचन (अंतिम भाग) (ii)
*********************

No comments:

Post a Comment