

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग दुसरा- परिव्राजकांची धम्मदीक्षा
Conversion of Parivrajakas


The Buddha's First Sermon- Ashtanga Marga or The Path of Righteousness
*************************
1) नंतर बुद्धांनी परिव्राजकांना अष्टांग मार्गाविषयी प्रवचन दिले. बुद्धांनी सांगितले की अष्टांग मार्गाचे आठ घटक आहेत.
(
सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम व सम्यक स्मृती
)


2) अष्टांग मार्गाचे पहिले व सर्वात महत्वाचे अंग 'सम्मा दिट्ठी' (सम्यक दृष्टी) Right View. याच्या स्पष्टीकरणाने बुद्धांनी आपल्या प्रवचनास सुरुवात केली.
3) "सम्यक दृष्टीचे महत्त्व समजण्याकरिता," बुद्ध परिव्राजकांना म्हणाले:
4) "परिव्राजकहो, जग ही एक अंधारकोठडी असून मनुष्य हा तिच्यातील एक कैदी आहे हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे."
5) "ही अंधारकोठडी गडद अंधाराने भरलेली आहे. अंधार इतका आहे की कैद्याला क्वचितच काही दिसू शकते. कैद्याला आपण कैदी आहोत हेही कळत नाही."
6) "खरोखर, दीर्घकाळ अंधारात राहिल्यामुळे मनुष्य केवळ आंधळा होऊन राहिलेला आहे; इतकेच नाही तर ज्याला प्रकाश म्हणतात अशी एखादी वस्तू अस्तित्वात असू शकते याबद्दल त्याला शंका वाटते."
7) "मन हे एक असे साधन आहे की, ज्याच्यामुळे मनुष्याला प्रकाश मिळू शकतो."
8 ) "तथापि, या अंधारकोठडीतील कैद्यांच्या मनाची अशी अवस्था नाही की, त्यांचे मन हे या बाबतीत एक साधन ठरेल."
9) "त्यांच्या मनाची अवस्था त्यांना केवळ दृष्टी असल्यामुळे अंधारासारखी एक वस्तू अस्तित्वात आहे हे दाखविण्यापुरता अगदी थोडा प्रकाशच आत येऊ देते."
10) "अशा प्रकारे त्यांची आकलनशक्ती स्वभावतःच सदोष असते."
11) "परंतु परिव्राजकहो, या कैद्यांची स्थिती जितकी दिसते तितकी निराशाजनक नाही हे लक्षात घ्या."
12) "कारण माणसात इच्छाशक्ती या नावाची एक शक्ती असते. जेव्हा योग्य हेतू निर्माण होतात तेव्हा या इच्छाशक्तीला जागृत करता येते व तिला गती देता येते."
13) "कोणत्या दिशेने इच्छाशक्तीला गती द्यावी हे पाहण्याइतकाही जरी माणसाला प्रकाश मिळाला तरी तो मनुष्य अशाप्रकारे आपल्या इच्छाशक्तीला गतिमान करु शकेल की, शेवटी त्याची गतिमान इच्छाशक्ती त्याला बंधमुक्त व स्वतंत्र करील."
14) "अशा प्रकारे मनुष्य जरी बंधनात असला तरी तो बंधमुक्त होऊ शकेल. शेवटी स्वातंत्र्याकडे नेणारी पावले टाकण्यास तो कोणत्याही क्षणी सुरुवात करील."
15) "आपणाला पाहिजे त्या मार्गाने जाण्यासाठी आपल्या मनाला आपण वळण लावू शकतो हे याचे कारण आहे (This is because it is possible to train the mind in whatever directions one chooses). मन हेच आपल्याला जीवनाच्या कारागृहात बंदीवान करीत असते आणि तेच आपल्याला तेथे डांबून ठेवते."
16) "पण मन जी गोष्ट निर्माण करते ती ते नष्टही करु शकते. जर मनाने माणसाला बंधनात टाकले असेल तर तेच मन योग्य दिशेने वळविल्यास त्याला बंधमुक्तही करु शकते."
17) "सम्यक दृष्टी जे करु शकते ते हेच होय."









*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
४. बुद्धांचे पहिले प्रवचन (पुढे चालू)- अष्टांग मार्ग किंवा सदाचाराचा मार्ग (ii)
*********************
No comments:
Post a Comment