

*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन


The Upanishads and their Teachings
*************************
1) उपनिषदे हे वाङमयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होते. उपनिषदे वेदांचा भाग नव्हते. कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही.
2) असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङमयाचाच एक भाग झाला.
3) उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. काही महत्त्वाचे तर काही महत्त्वाचे नसलेले.
4) त्यापैकी काही उपनिषदे वैदिक ब्राम्हण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात.
5) वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय याविषयी या सर्वांचे एकमत होते.
6) चार वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय याविषयी या सर्वांचे एकमत होते.
7) वेद हे ईश्वरनिर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते.
8 ) यज्ञ व त्यांचे फल, और्ध्र्वदेहिक आहुती (funeral oblations) आणि ब्राम्हणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राम्हणी तत्त्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते.
9) तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्रम्ह व आत्मा यांच्यावर केंद्रित झाली होती.
10) विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रम्ह हे सर्वव्यापी तत्त्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करुन घेण्यातच आत्म्याची मुक्ती आहे.
11) उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की, ब्रम्ह हे सत्य आहे. आणि आत्मा म्हणजे ब्रम्हच होय. उपाधीत गुंतल्यासारखे आत्म्याला मी ब्रम्ह आहे याची जाणीव होत नाही.
12) प्रश्न असा होता की, 'ब्रम्ह हे सत्य आहे काय?' उपनिषदांचे सिद्धांत मान्य करावयाचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे.
13) ब्रम्ह हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धांना मिळाला नाही. म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले.
14) उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते:
15) अशा प्रकारचे प्रश्न याज्ञवल्क्यांसारख्या महान महर्षीला विचारण्यात आले होते. बृहदारण्यक उपनिषदांत ज्या याज्ञवल्क्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
16) त्याला विचारण्यात आले: "ब्रम्ह म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय?" या प्रश्नावर, "नेति! नेति! मला माहित नाही! मला माहित नाही!" एवढेच याज्ञवल्क्य सांगू शकला.
17) "ज्याच्याविषयी कोणालाच काही माहित नाही ते सत्य कसे असू शकेल?" असा बुद्धांचा प्रश्न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धांना कोणतीही अडचण भासली नाही.
*************************
प्रथम खंड, भाग पाचवा समाप्त.









*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग सहावा- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
१. बुद्धांचे समकालीन
*********************
No comments:
Post a Comment