

*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन


The Bramhanas
*************************
27) ब्राम्हणी यज्ञ (sacrifices) हे बहुधा ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञांचा 'खोटे यज्ञ' म्हणून बुद्धांनी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मान्य नव्हते.
28) यज्ञविरोधी असलेले लोक ब्राम्हणांचा उपहास करुन म्हणत, "पशूचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर मग त्याने स्वतःच्या बापाचाच बळी का देऊ नये? स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल."
29) बुद्ध या विचारांशी अंतःकरणपूर्वक सहमत होते.
30) यज्ञाचा सिद्धांत बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता, तितकाच चातुर्वर्ण्याचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता.
31) चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राम्हण धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटत नाही. तिच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या वर्चस्वासाठी तयार केलेली अशी ती समाजरचना होती. तथापि, मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता.
32) ब्राम्हणांची चातुर्वर्ण्य पद्धत ही कधीही न बदलणारी कायमस्वरुपाची अशी समाजरचना होती. एखादा ब्राह्मण झाला की तो कायमचाच ब्राह्मण. एखादा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय. एखादा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य. आणि शूद्र तो कायमचा शूद्र. ही समाजरचना व्यक्तीच्या जन्मावरुन प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. या व्यवस्थेत माणसाचा दुर्गूण कितीही भयंकर असला तरीही त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे; आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काही किंमत नसे. योग्यता आणि प्रगती यांना या समाजरचनेत स्थान नव्हते.
33) विषमता प्रत्येक समाजात असते. पण ब्राम्हणी धर्मात अगदी निराळे होते. ब्राम्हणांनी सांगितलेली विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व (official doctrine) होते. समाजावर वाढलेले ते केवळ बांडगूळ नव्हते. ब्राम्हणी धर्माचा समतेवर विश्वास नव्हता. वस्तुतः समतेला त्याचा विरोध होता.
34) ब्राम्हणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही. धार्मिक वटवृक्षाखाली वर्गवार क्रमिक विषमता हे त्याचे सार होते (graded inequality).
35) समाजात सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहिले, पण क्रमवार विषमतेनेे समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ते अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धांना वाटते.
36) चार वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेले होते. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणालाही नव्हते. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते तर ते जन्मावरुन निश्चित केले गेले होते.
37) चातुर्वर्ण्याच्या नियमांचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राम्हणी धर्माने ज्या तात्त्विक पायावर समाजरचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसेल, तरी तो चुकीचा खास होता.









*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
३. ब्राह्मणे (iv)
*********************
No comments:
Post a Comment