

*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन


The Bramhanas
*************************
16) पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते. दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्याचे उदिष्ट् वैराग्य जीवनाची म्हणजे गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करुन देणे व चौथ्या आश्रमाचे उदिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते.
17) या आश्रमाचे फायदे फक्त तीन वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत. पहिला आश्रम शूद्र व स्रिया यांच्यासाठी नव्हता. त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्रियांना वर्ज्य होता.
18) चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य आदर्श समाजरचना (divine pattern). तिला चातुर्वर्ण्य असे नाव देण्यात आले होते. ब्राम्हणांनी नियमाला आदर्शाचे स्वरुप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणीवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला. (The Brahmins had idealised the rule and had realised the ideal without leaving any cracks or loopholes. )
19) ब्राम्हणी तत्त्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवाद होय. आत्म्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा तो एक भाग होता. ब्राम्हणांचे कर्मवादाचे तत्त्वज्ञान हे 'पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो?' या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राम्हणी तत्त्वज्ञानाचे उत्तर असे की, 'आत्मा कुठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यावर अवलंबून आहे.' दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून असते.
20) ब्राम्हणी तत्त्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धांचा तीव्र विरोध होता. वेद हे स्खलनातीत (infallible) आहेत व त्यांचा अधिकार वादातीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धांनी नाकबूल केले.
21) त्यांच्या मते निर्दोष, वादातीत व अंतिम असे काहीही नाही. कोणत्याही गोष्टीची फेरतपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्यवाय नसावा.
22) माणसाला सत्य समजले पाहिजे. बुद्धांच्या मते विचारस्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची व आवश्यक बाब आहे. आणि सत्य शोधून काढण्याचा विचारस्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती.
23) वेद वादातीत व अचूक आहेत असे मानणे (infallibility of the Vedas) याचा अर्थ विचारस्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय.
24) या कारणास्तव ब्राम्हणी तत्त्वज्ञानाचा पहिला सिद्धांत तथागत बुद्धांना दोषी वाटला.
25) ब्राम्हणी तत्त्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता. यज्ञामध्ये (sacrifices) काही तथ्य जरी असले, तरी खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यांत त्यांनी भेद केला. (true sacrifice and false sacrifice)
26) 'दुसऱ्याच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे' हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी, ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी, एखाद्या पशूचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय.









*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग पाचवा- बुद्ध आणि त्यांचे पूर्वकालीन
३. ब्राह्मणे (iii)
*********************
No comments:
Post a Comment