

*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग चवथा- ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी


The Discovery of a New Dhamma
**************************
1) नव्या प्रकाशाच्या प्राप्तीसाठी गौतम जेव्हा चिंतनास बसला तेव्हा सांख्य तत्त्वज्ञानाची पकड त्याच्या मनावर होती.
2) त्याच्या मते जगातील व्यथा आणि दुःख यांचे अस्तित्व ही एक निर्विवाद वस्तुस्थिती होती.
3) तथापि, दुःख नाहीसे कसे करावे हे जाणण्यास गौतम उत्सुक होता. सांख्य तत्त्वज्ञानाने या प्रश्नाचा विचार केला नव्हता.
4) आणि म्हणून, -दुःख नाहीसे कसे करावे या प्रश्नावर - त्याने आपले चित्त केंद्रित केले.
5) स्वाभाविकपणे त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला की, "व्यक्तिमात्राला भोगाव्या लागणाऱ्या दुःखाची व कष्टाची कारणे कोणती?"
6) त्याचा दुसरा प्रश्न असा होता की, "दुःख नाहीसे कसे करता येईल?"
7) या दोन्ही प्रश्नांचे बरोबर व योग्य उत्तर त्याला मिळाले, ते उत्तर म्हणजे, सम्यक संबोधी (खरी ज्ञानप्राप्ती). 'Samma Bodhi' (Right Enlightenment)
8 ) याच कारणामुळे त्या पिंपळवृक्षाला "बोधिवृक्ष" असे नाव मिळाले.









*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
४. बोधिसत्त्व गौतम सम्यक् संबोधीनंतर 'बुद्ध' होतात
*********************
No comments:
Post a Comment