प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*************************
भाग तिसरा- नव्या प्रकाशाच्या शोधात


Training in Samadhi Marga
*************************
14) त्याचा तो ध्यानविधी शिकण्याचा आणि समाधीची सर्वोच्च पायरी अनुभवण्याचा गौतमाने विचार केला. म्हणून तो उद्दक- रामपुत्ताच्या आश्रमात गेला आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेऊ लागला.
15) थोड्याच काळात उद्दकाच्या ध्यानविधीची आठवी पायरी त्याने आत्मसात केली. उद्दक रामपुत्ताच्या ध्यानविधीचे पूर्ण ज्ञान मिळविल्यावर गौतमाने आलारकालामांना जो प्रश्न विचारला होता तोच प्रश्न उद्दक रामपुत्तालाही विचारला की, "आणखी काही शिकण्याजोगे आहे काय?"
16) आणि उद्दक रामपुत्ताने तेच उत्तर दिले, "नाही मित्रा, तुला शिकविता येण्यासारखे यापेक्षा अधिक माझ्याजवळ काही नाही."
17) आलारकालाम आणि उद्दक-रामपुत्त हे ध्यानमार्गावरील प्रभुत्वासाठी कोशल देशात प्रसिद्ध होते. पण गौतमाने असे ऐकले होते कि, मगध देशातही अशा प्रकारे ध्यानमार्गसंपन्न योगी आहेत. त्यांच्या पद्धतीचेही शिक्षण मिळवावे असा त्याने विचार केला.
18) त्याप्रमाणे गौतम मगध देशात गेला.
19) त्याला असे आढळून आले की, त्यांची ध्यानमार्गाची प्रक्रिया जरी श्वासोच्छवास नियंत्रणावरच आधारलेली होती तरी कोशल देशातील प्रचलित प्रक्रियेपेक्षा ती निराळी होती.
20) ही प्रक्रिया श्वासोच्छवास करण्याची नव्हती, तर श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता साधण्याची होती.
21) गौतम ही प्रक्रिया शिकला. श्वासोच्छवास थांबवून चित्ताची एकाग्रता करण्याचा जेव्हा त्याने प्रयत्न केला तेव्हा त्याला टोचणारे तीव्र आवाज आपल्या कानांतून बाहेर पडत आहेत आणि जणू काही तीक्ष्ण टोकाच्या सुरीने आपले डोके टोचले जात आहे असे जाणवत होते.
22) ती दुःखदायक प्रक्रिया होती. तरी पण त्यात कौशल्यपूर्ण निपुणता प्राप्त करण्यात गौतम यशस्वी झाला. समाधी-मार्गाचे त्याचे शिक्षण अशा प्रकारचे होते.
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग तिसरा - नव्या प्रकाशाच्या शोधात
४. वैराग्याची कसोटी
*********************
No comments:
Post a Comment