

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग तिसरा - महापरिनिर्वाण
Part III- His End
*************************


Ananda in Grief
*************************
14) "आनन्द! तुझ्या अमाप प्रेमळ कार्यामुळे, दयाशील सुस्वभावामुळे तू दीर्घकालीन माझा अगदी निकटवर्ती झाला आहेस."
15) "आनंद! तू हुशार आहेस. निष्ठेने प्रयत्न कर म्हणजे तूसुद्धा विषयासक्ती, अहंकार, मोह व अज्ञान ह्यासारख्या दुःखद गोष्टींपासून मुक्त होशील."
"You have done well, Ananda! Be earnest in effort, and you too shall be free from the great evils--from sensuality, from individuality, from delusion, and from ignorance."
16) नंतर आनंदाबद्दल भिक्खूंना उद्देशून ते बोलले, "आनंद बुद्धिमान, ज्ञानी (wise) आहे. भिक्खूहो, आनंद बुद्धिमान आहे."
17) "तथागतांची आपण केव्हा भेट घ्यावी हे तो जाणतो. भिक्खू, भिक्खूणींनी कोणत्या समयी भेट घ्यावी हे तो जाणतो. उपासक उपासिकांची भेटण्याची योग्य वेळ कोणती, राजा किंवा राजमंत्र्याची वेळ कोणती, तसेच दुसऱ्या आचार्याची व शिष्यांची वेळ कोणती, हे ही त्याला ठाऊक आहे."
18) "भिक्खूहो! हे आनंदाचे चार विशेष आहेत."
19) "आनंदाला भेटल्यावर सर्वांना समाधान मिळते. त्याला पाहून त्यांना आनंद होतो."
20) ह्यानंतर आनंदाने पुन्हा तथागतांच्या परिनिर्वाणाचा विषय काढला. तथागतांना उद्देशून तो बोलला, "तथागतांनी या उजाड नगरीत, या जंगलामध्ये देहत्याग करु नये. चम्पा, राजगृह, श्रावस्ती, साकेत, कोसाम्बी, वाराणशीसारखी मोठी नगरे आहेत. ह्यापैकी कोणत्या तरी नगरात त्यांनी परिनिर्वाण प्राप्त करावे."
21) "आनंद! असे बोलू नकोस. असे बोलू नकोस, आनंद! ही कुशिनारादेखील केशवती नावाची महासुदर्शन राजाची राजधानी आहे."
22) नंतर तथागतांनी आनंदावर दोन कामे सोपवली.
23) त्यांनी आनंदाला सांगितले की, चुन्दाने दिलेल्या अन्नामुळे तथागतांना मृत्यू आला अशी वार्ता पसरणार नाही ह्याची खबरदारी घे. त्यामुळे चुन्द संकटात सापडेल अशी भीती वाटते. त्यांनी सांगितले की, ह्या बाबतीत लोकांच्या मनातील भ्रम आनंदाने दूर करावा.
24) अाणखी एक गोष्ट त्यांनी आनंदास करण्यास सांगितली. ती म्हणजे कुशीनाराच्या मल्लांना जाऊन सांगणे की, तथागत ह्या उपवनात आले असून रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी त्यांचे परिनिर्वाण होईल.
25) तुझ्यावर दोष येईल अशी संधी तू देऊ नकोस. मल्ल कदाचित म्हणतील की, "आमच्या गावात तथागतांचा मृत्यू झाला आणि आम्हाला समजले नाही. त्यांच्या अखेरच्या क्षणी त्यांना भेटण्याची संधीही आम्हाला मिळाली नाही."
26) त्यानंतर स्थविर अनुरुद्ध व स्थविर आनंद ह्या उभयतांनी धार्मिक चर्चेत उरलेली रात्र व्यतीत केली.
27) आणि त्यांनी आधीच सांगितल्याप्रमाणे रात्रीच्या तिसऱ्या प्रहारात तथागत बुद्धांनी अखेरचा श्वास घेतला.
(And in the third part of the night, as previously announced, the Blessed One breathed his last.)
28) जेव्हा तथागतांचे परिनिर्वाण झाले, तेव्हा काही भिक्खू व आनंद हात पसरुन रुदन करु लागले, काही तर दुःखातिशयाने जमिनीवर गडबडा लोळू लागले व म्हणू लागले, "तथागतांना फारच लवकर परिनिर्वाण आले, ह्या सुखी माणसांने फारच लवकर जीवनत्याग केला. जगातून फारच लवकर प्रकाश निघून गेला."
29) वैशाखी पोर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहरात तथागत बुद्धांचे परिनिर्वाण झाले. ते वर्ष होते इ.स. पूर्व 483.
(It was at midnight on Vaishakha Paurnima that the Blessed Lord breathed his last. The year of his death was 483 B.C.)
30) पाली भाषेतल्या ग्रंथांत म्हटले आहे:
*दिवा तपति आदिच्चो*
*रत्तिं आभाति चन्दिमा*
*सन्नद्धो खत्तियो तपति*
*झायी तपति ब्राम्हणो*
*अथ सब्बं अहोरतिं*
*बुद्धो तपति तेजसा*
31) "सूर्य केवळ दिवसाच प्रकाश देतो आणि चंद्र केवळ रात्रीलाच प्रकाशमान करतो. आपल्या शस्त्रांना धारण केल्यामुळे क्षत्रिय तेजस्वी दिसतो. जेव्हा ध्यानस्थ असतो तेव्हाच ब्राम्हण तेजस्वी दिसतो. पण बुद्ध मात्र स्वयंतेजाने दिवस रात्र प्रकाशित राहतो."
32) *"निःसंदेह तो जगाचा प्रकाश होता."*
*("He was beyond question the light of the world.")*








*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*भाग तिसरा- महापरिनिर्वाण*
*५. मल्लांचा विलाप आणि एका भिक्खूची प्रसन्नता*
*************************
No comments:
Post a Comment