

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग तिसरा- बुद्धांच्या धम्माचे टीकाकार
Part III- Critics of His Doctrines
*************************


Critics of the Theory of Soul and Rebirth
*************************
1) तथागत बुद्धांनी सांगितले की आत्मा नाही. त्यांनी सांगितले की, पुनर्जन्म आहे.
2) ज्यांना तथागत बुद्धांच्या ह्या दोन तत्त्वांची शिकवण परस्परविरोधी वाटली असे टीकाकार कमी नव्हते.
3) ते म्हणाले, जर आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा असू शकेल?
4) खरे म्हणजे ह्यात काहीही परस्परविरोधी नाही. आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो.
5) आंब्याची कोय असते. कोयीतून वृक्ष निर्माण होतो. आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात.
6) हा आंब्याचा पुनर्जन्म आहे.
7) पण इथे तर आत्म्याचे अस्तित्वच नाही.
8). म्हणजे आत्मा नसला तरी पुनर्जन्म असू शकतो.
*************************------------------------------
*


Charge of Being an Annihilationist
------------------------------
1) एकदा श्रावस्तीतील जेतवनात तथागत बुद्धांचे वास्तव्य होते. तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की, अरिठ्ठ नावाचा एक भिक्खू, जी तथागतांची मते नाहीत ती त्यांची मते आहेत असे मानीत आहे.
2) तथागत हे विनाशवादी आहेत किंवा काय हे आरिठ्ठाच्या त्यांच्यासंबंधीच्या अनेक गैरमतांपैकी एक होते.
3) तथागतांनी अरिठ्ठला पाचारण केले. अरिठ्ठ आला. त्याला विचारल्यावर तो गप्प बसला.
4) तेव्हा तथागतांनी त्याला सांगितले, "काही श्रमण, ब्राम्हण चुकीने, गैरपद्धतीने, खोटेपणाने सत्याला झुगारुन मी विनाशवादी असल्याचा आरोप करतात. आणि विच्छेदाची, प्राणिमात्रांच्या समूळ नाशाची शिकवण देतो, असा माझ्यावर दोषारोप करतात."
5) "मी असा मुळीच नाही. आणि माझी अशी शिकवणही नाही."
6) "मी पूर्वी आणि आता सतत सांगत आलो आहे की, दुःखाला अस्तित्व आहे आणि शेवटही आहे."
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
तथागतांचे मित्र आणि प्रशंसक चाहते
*१. धनंजननी ब्राह्मणीची भक्ती*
*************************
No comments:
Post a Comment