पोस्ट नं 282

📚 पोस्ट नं 282 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग तिसरा- बुद्धांच्या धम्माचे टीकाकार
Part III- Critics of His Doctrines
*************************
🌷4. शीलप्रचार आणि दुःखनिर्मितीबाबत टीका (ii) 🌷
Charge of Preaching Virtue and Creating Gloom
*************************
*(4. iii) बौद्ध धम्म निराशावादी आहे काय?*
*************************

1) तथागत बुद्धांचा धम्म निराशा निर्माण करतो असा आरोप केला गेला आहे.

2) हा आरोप केला जाण्याचे कारण प्रथम आर्य सत्य आहे; जे सांगते की, जगात दुःख आहे.

3) ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे की, दुःखाचा उल्लेख होताच असला आरोप बौद्ध धम्मावर केला जावा.

4) कार्ल मार्क्स असा म्हणाला होता, "जगात शोषण सुरु आहे. आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहेत. आणि गरीब अधिक गरीब केले जात आहेत."

5) आणि तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही.



6) तर मग तथागतांच्या धम्माबाबत आणि सिद्धांताबद्दल निराळा दृष्टीकोन का?

7) असे समजते की, तथागत बुद्ध आपल्या पहिल्या प्रवचनात म्हणाले होते की, जन्म हा दुःखद, वृद्धत्व दुःखद व मृत्यू हा दुःखद आहे. ह्यामुळे कदाचित त्यांच्या धम्माला हा निराशेचा गहिरा रंग दिला गेला असेल.

8). पण ज्यांना अलंकारशास्त्र अवगत आहे ते जाणू शकतील की, हा एक अतिशयोक्तीचा प्रकार आहे आणि परिणाम साधण्यासाठी चतुर साहित्यिक तो वापरतो.

9) जन्म हा दुःखद आहे, ही अतिशयोक्ती आहे; हे तथागत बुद्धांच्या एका प्रवचनाचा संदर्भ देऊन सिद्ध करता येईल की, ज्यात सांगितले आहे की *मानव जन्म ही एक अनमोल गोष्ट आहे.*

10) आणि शिवाय तथागत बुद्धांनी दुःखाचा नुसताच उल्लेख केला असता तर हा आरोप मान्य होऊ शकला असता.

11) पण तथागत बुद्धांच्या दुसऱ्या आर्य सत्यात दुःखाचा नाश केला पाहिजे ह्यावर विशेष भर देण्यात आला आहे. *दुःखाचा नाश करण्याच्या कर्तव्यावर भर देण्यासाठीच त्यांना दुःखाचे अस्तित्व सांगावे लागले.*



12) दुःख नाहीसे करावे ह्या गोष्टीला तथागत बुद्धांनी फार महत्त्व दिले आहे. कपिलाने दुःखाचे फक्त अस्तित्व जाहीर करुन त्याविषयी अधिक स्पष्ट केले नाही असे जेव्हा त्यांना आढळले, तेव्हा असंतुष्ट होऊन त्यांनी आलार कालाम मुनींचा आश्रम सोडला.

13) मग हा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल?

14) दुःखाचा नाश करण्यास जो गुरू उत्सुक आहे व दुःख दूर करण्याची तो सतत काळजी वाहतो, अशा गुरुवर निराशावादाचा आरोप नक्कीच करता येत नाही.

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*५. आत्मा आणि पुनर्जन्म तत्त्वांचे टीकाकार*
*************************

No comments:

Post a Comment