

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग तिसरा- बुद्धांच्या धम्माचे टीकाकार
Part III- Critics of His Doctrines
*************************


Charge of Preaching Virtue and Creating Gloom
*************************
(4.i) दुःख हे निराशाजनक आहे
Dukkha as the Cause of Gloom
-------------------------------------------
1) दुःखाचा कपिलने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता, क्षोभ. (Unrest, commotion.)
2) सुरुवातीला त्याला अध्यात्मिक (metaphysical) अर्थ होता.
3) नंतर त्याला यातना व दुःख असा अर्थ प्राप्त झाला.
4) हे दोन अर्थ एकमेकांहून फार भिन्न नव्हते. ते निकटसंबधी होते.
5) अशांततेमुळे यातना व दुःख निर्माण होते.
6) लवकरच या शब्दाचा अर्थ सामाजिक व आर्थिक कारणामुळे होणाऱ्या यातना व दुःख असा झाला.
7) तथागत बुद्धांनी दुःख व यातना या शब्दांचा अर्थ कोणत्या अर्थी केला?
8). तथागत बुद्धांच्या एका प्रवचनावरुन असे स्पष्ट दिसते की, दारिद्रय हे दुःखाचे कारण आहे ह्याची त्यांना पूर्ण जाणीव होती.
9) त्या प्रवचनात ते म्हणतात, "भिक्खूहो, ह्या जगातील स्वच्छंदी माणसांना दारिद्रय ही दुःखकारक गोष्ट वाटते काय?"
10) "होय, तथागत."
11) "आणि जेव्हा मनुष्य गरीब असतो, विपत्तीत असतो, तेव्हा तो कर्ज काढतो. हेसुद्धा दुःखद आहे काय?"
12) "होय, तथागत?"
13) "आणि जेव्हा तो कर्जबाजारी होतो, तेव्हा तो उसनवारी करतो. हेसुद्धा दुःखद आहे काय?"
14) "तथागत, खात्रीने."
15) "आणि जेव्हा रक्कम चुकती करण्याची वेळ येते, तेव्हा तो ती परतफेड करत नाही. आणि म्हणून धनको त्याला तगादा लावतात. हे ही दुःखद आहे काय?"
16) "तथागत, नक्की."
17) "आणि तगादा लावूनही तो देत नाही, तेव्हा ते मारपीट करतात. हे पण दुःखद आहे काय?"
18) "खात्रीने, तथागत."
19) "आणि मारपीट करुनही तो रक्कम देत नाही. तेव्हा ते त्याला बंधनात अडकवतात. हे पण दुःखद आहे काय?"
20) "होय, तथागत."
21) "अशा पद्धतीने भिक्खूहो, गरीबी, कर्ज, उधारी, तगादा लावला जाणे, मारपीट होणे आणि बंधनांत पडणे ही सर्व इहलोकातील स्वच्छंदी माणसांची दुःखे आहेत."
22) ह्या जगात गरीबी आणि कर्ज ह्या फार दुःखद गोष्टी आहेत.
23) ह्यावरुन असे लक्षात येते की, तथागत बुद्धांची दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरुपाची होती.
******************************(4.ii) अशाश्वतता हे निराशेचे कारण
Impermanence as the Cause of Gloom
-------------------------------------------
1) जे जे मिश्रित स्वरुपाचे आहे ते ते अशाश्वत आहे. ह्या सिद्धांतामुळे आलेल्या आरोपाचे आणखी एक कारण आहे. (Everything which is compound is impermanent)
2) ह्या सिद्धांताची सत्यता कोणीही नाकारत नाही.
3) सर्व अशाश्वत आहे हे सर्वांनी मान्य केले होते.
4) ज्याप्रमाणे सत्य हे कितीही अप्रिय असले तरी ते कथन केले पाहिजे. त्याप्रमाणे हा सिद्धांतही खरा असेल तर तो जाहीर केला पाहिजे.
5) पण मग निराशाजनक तात्पर्य का काढले जावे?
6) जर जीवन अल्पजीवी असेल तर ते अल्पजीवी असणारच. त्याबद्दल कुणी निराश होण्याचे कारण नाही.
7) ही फक्त दृष्टीकोनाच्या भिन्नतेची बाब आहे.
8). ब्रम्ही लोकांचा दृष्टीकोन फारच निराळा आहे.
9) कुटुंबातील कोणाचे निधन झाले तर ब्रम्ही लोक तो आनंददायक सोहळा म्हणून साजरा करतात.
10) ज्या दिवशी निधन होते त्या दिवशी कुटुंबप्रमुख सार्वजनिक मेजवानी आयोजित करतो आणि नंतर लोकनृत्य करीत तो मृतदेह स्मशानात नेतात. मृत्यू हा अपरिहार्य होता हे जाणून कोणी त्याची पर्वा करत नाही.
11) अशाश्वतता ही निराशाजनक असेल, तर त्याचे कारण शाश्वतता ही खरी नसतानासुद्धा खरी मानली गेली हे होय.
12) तथागत बुद्धांची शिकवण ही निराशाप्रसारक आहे असा आरोप म्हणूनच करता येत नाही.
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*४.iii. बौद्ध धम्म निराशावादी आहे काय?*
*************************
No comments:
Post a Comment