पोस्ट नं 279

📚 पोस्ट नं 279 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग तिसरा- बुद्धांच्या धम्माचे टीकाकार
Part III- Critics of His Doctrines
*************************
🌷2. व्रत-नियमांचे टीकाकार 🌷
Critics of the Rule of Vows
*************************

1) पंचशील पुरेसे नाही काय? व्रतग्रहणाची काय आवश्यकता आहे? असे प्रश्न नेहमी विचारले जात असत.

2) जर औषधाशिवाय रोग बरे होऊ शकतात तर वांतीच्या, जुलाबाच्या आणि तत्सम औषंधानी देह दुर्बल करण्याचा फायदा काय? असे मतप्रदर्शन केले जात असे.

3) तसेच गृहस्थ उपासकांना संसारात राहून, सर्व सुखे उपभोगूनही पंचशीलाने शांती व श्रेष्ठ निर्वाण प्राप्त होऊ शकते तर भिक्खूंना आणखी व्रतग्रहण करण्याची आवश्यकता काय?

4) तथागतांनी ही व्रते त्यातील स्वाभाविक गुणवत्तेसाठी योजिले आहेत.

5) व्रतस्थ जीवनामुळे आपोआपच सत्त्वाची वृद्धी होते व अधःपातापासून रक्षण होते.

6) जे व्रतग्रहण करतात आणि स्वावलंबनाने त्याची जोपासना करतात त्यांना मुक्ती प्राप्त होते.

7) व्रतग्रहण म्हणजे वासना, असूया, अहंकार ह्याचे नियमन वा कुविचारांचे निर्मूलन.

8). जे व्रतग्रहण करतात आणि त्यांची जोपासना करतात ते सुरक्षित असतात व त्यांचे आचार विचार सर्वस्वी पवित्र असतात.



9) मात्र फक्त पंचशील ग्रहण केल्याने हे साध्य होत नाही.

10) व्रतग्रहणाने नैतिक अधःपतनापासून जसे संरक्षण होते तसे पंचशील ग्रहणाने होत नाही.



11) व्रतस्थ जीवन अत्यंत कठीण असते. पंचशील ग्रहणाचे मात्र तसे नसते. मानवजातीच्या हितासाठी काहींनी व्रतस्थ जीवन पत्करणे आवश्यक असते म्हणून तथागतांनी दोन्हींची योजना केली होती.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘

**********************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*३. अहिंसा - तत्त्वाचे टीकाकार*
*************************

No comments:

Post a Comment