*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 15. देशत्यागाची तयारी (ii) 🌷
(Offer of Exile)
*********************
12) "पण लक्षात ठेव, तुला शासन करण्याचे संघाजवळ दुसरे मार्ग आहेत. संघ तुझ्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार टाकू शकेल. आणि संघ तुझ्या कुटुंबाची जमीन जप्त(confiscate) करु शकेल. याकरिता कोशल राजाची अनुमती मिळविण्याची संघाला आवश्यकता नाही."
13) कोलियांशी युद्ध करण्याच्या संघाच्या योजनेला विरोध करीत राहण्यामुळे दुष्परिणाम भोगावे लागतील याची सिद्धार्थाला जाणीव झाली. त्याला तीन पर्याय विचारात घ्यावे लागले: एक, सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होणे. दुसरा, देहान्तशासनाला अथवा देशत्यागाला संमती देणे. आणि तिसरा आपल्या कुटुंबावर सामाजिक बहिष्कार ओढवून घेऊन त्याच्या मालमत्तेची जप्ती होऊ देण्यास तयार होणे.
14) पहिला पर्याय न स्विकारण्याबाबत त्याचा निर्धार होता. तिसऱ्या पर्यायाविषयीचा विचारच त्याला असह्य झाला. या स्थितीत त्याला दुसरा पर्यायच सर्वात अधिक योग्य वाटला.
15) त्यानुसार सिद्धार्थ संघाला उद्देशून म्हणाला, "कृपा करुन माझ्या कुटुंबियांना शासन करु नका. सामाजिक बहिष्काराच्या आपत्तीत लोटून त्यांना दुःख देऊ नका. त्यांच्या उपजिवीकेचे एकमेव साधन असलेली त्यांची शेती हिरावून घेऊन व त्यांना निराश्रित करून त्यांची उपासमार करु नका. ते निरपराध आहेत. अपराधी मीच आहे. माझ्या अपराधाची शिक्षा मला एकट्यालाच भोगू द्या. मला देहान्ताची वा देशत्यागाची यापैकी तुम्हाला योग्य वाटेल ती शिक्षा द्या. ती मी स्वेच्छेने स्विकारेन. याबाबत कोशलाधिपतीकडे मी मुळीच याचना(appeal) करणार नाही याचे मी आपणास अभिवचन देतो."
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १६. मार्ग सापडला - परिव्रज्या
*********************
No comments:
Post a Comment