पोस्ट नं 241

📚 पोस्ट नं 241 📖
*************************
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- बुद्धांची प्रवचने
Part IV- His Sermons
*************************
VI (सहा)- बुद्धांची सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने
SECTION SIX-- SERMONS ON SOCIO-POLITICAL QUESTIONS
🌷5. शांती स्थापन करणाऱ्या जेत्याची कर्तव्ये 🌷
The Duty of the Victor Who Has Won Peace
*************************

1) जेव्हा विजेता शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवितो, त्या वेळी पराजितावर गुलामगिरी लादण्याचा नसला, तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो. ह्या विषयावर बुद्धांचे मत अगदी वेगळे आहे. त्यांच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल, तर विजेत्याने शांततेच्या काळाचा पराजिताच्या कल्याणासाठी उपयोग करणे, हे त्याचे कर्तव्य ठरते. ह्या विषयावर बुद्धांनी भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे:-

2) "युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या आपुलकीच्या, अनुग्रहपूर्ण वाणी, उद्धटपणाविरहित दयाळू वृत्ती, ह्या गुणांचा अविष्कार केला पाहिजे. आपण कोणी आडदांड, आक्रमक नसून सहज वागणारे कृतज्ञ असे पाहुणे आहोत, इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, हाव धरून परधन हिरावून न घेणारे असे आहोत, असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे क्षुद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये."

3) "सर्व प्राणिमात्रांना सुखसमृद्धी आणि शांतता लाभो, सबळ-दुर्बळ, लहान-मोठे, प्राणिमात्र शांततेचा सदैव उपभोग घेत राहोत, दृश्य-अदृश्य, जवळचे-दूरचे, जात आणि अजात जीव शांतीचा उपभोग घेवोत अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे."

4) "कोणालाही आपल्या बांधवाची खुशामत करण्याची अथवा त्यांचा उपमर्द करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबविण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी विजेत्याने येऊ देऊ नये."

5) "ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला ईजा पोहचू नये म्हणून जपते, त्याप्रमाणे जेत्याने सर्व जीवमात्रांसंबंधी विवेक धरावा. विश्वातील वरच्या-खालच्या, भोवतालच्या, साऱ्या देशांच्या प्राणिमात्रावर अंतःकरणपूर्वक प्रेम करावे, त्यांच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये. *कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतःकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य करू नये."*

6) "म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना, उठताना, आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत रहा, *"हे सर्वोत्तम धम्मराज्य आहे."*

☘☘☘☘☘☘
------------------------------
🌺 *खंड चवथा समाप्त* 🌺
------------------------------
☘☘☘☘☘☘

**********************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
पाचवा खंड:- संघ
भाग पहिला:- संघ
*१. संघ आणि संघाची संघटनात्मक संरचना*
*************************

No comments:

Post a Comment