

*************************

लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- बुद्धांची प्रवचने
Part IV- His Sermons
*************************
V (पाच)- बुद्धांची धम्मावरील प्रवचने
SECTION FIVE-- Sermons on Dhamma


Why Right Views Rank First
***********************
1) अष्टांग मार्गांपैकी सम्यक दृष्टी हे एक महान तत्त्व आहे.
2) *सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे.*
3) सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व अकुशल कार्यांचे मूळ होय.
4) सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्व सृष्ट चमत्कार हे कार्यकारणभावांची प्रक्रिया आहे, असे पाहायला शिकले पाहिजे. *सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारणभावाची ओळख.*
5) "भिक्खूहो, ज्यांची दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, उपजीविका, साधना, स्मृती, आणि समाधी मिथ्या आहेत, ज्यांचे ज्ञान आणि मुक्ती ही मिथ्या आहेत, ज्यांचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने सांधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय, दुःखकर, जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व का? तर त्याची दृष्टी मिथ्या असल्यामुळे."
6) "आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही. एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारते; परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की, त्या बालकाला मार्गाच्या योग्यायोग्यतेची जाणीव आहे. योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे."
7) "हे आनंदा, यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल?
*"बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे, कोणते अशक्य आहे, ह्या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळवले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल."*












Why Bother About Life After Death?
1) एकदा स्थविर महाकश्यप आणि स्थविर सारीपुत्त हे बनारसजवळच्या इसिपत्तनमधील मृगदायामध्ये राहात होते.
2) त्या वेळी स्थविर सारीपुत्त सायंकाळी आपला एकांत संपवून अर्हत स्थविर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले.
3) अशा रीतीने बसल्यावर स्थविर सारीपुत्ताने महाकश्यपाला प्रश्न केला, "मित्रा, कश्यपा, मृत्यूनंतर तथागतांना अस्तित्व असते काय?"
4) "तथागतांना मृत्यूनंतर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काहीच सांगितलेले नाही."
5) "मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्हीही गोष्टी मानावयाच्या काय?"
6) "मित्रा, हे सुद्धा तथागतांनी म्हटलेले नाही."
7) "तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही. अथवा नाही असेही नाही असे म्हणावयाचे काय?"
"हे सुद्धा तथागतांनी म्हटले नाही."
8). "मित्रा, हे तथागतांनी का म्हटलेले नाही?"
9) *"कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्त्वाशी संलग्न नाही. तो प्रश्न आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यांपैकी काहीच साधून देत नाही. आणि म्हणूनच तथागतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही."*










**********************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
*३. ईश्वराची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे*
*************************
No comments:
Post a Comment