*"बुद्ध आणि त्यांचा धम्म"*
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
🌷 14. संघाशी संघर्ष 🌷
(Conflict with the Sangh)
*********************
1) सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करुन घेतल्यानंतर आठ वर्षे लोटली होती.
2) संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते. व त्यामुळे तो सर्वांचा प्रिय झाला होता.
3) तो संघाचा सभासद झाल्यापासून आठव्या वर्षी अशी एक घटना घडली की जी शुद्धोदनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती (crisis) ठरली.
4) या दुःखान्तिकेचा आरंभ असा आहे:
5) शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून "कोलियांचे" राज्य होते. "रोहिणी" नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती.
6) रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलीय हे दोघेही आपापल्या शेतीकरीता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे.
7) सिद्धार्थाच्या वयाला अठ्ठावीस वर्षे झाली त्या वर्षी, शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकांत नदीच्या पाण्यावरुन फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या.
8.) जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलीय यांना मिळाली, तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले.
9) म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन (session, सत्र) बोलाविले.
☘🌿🌸🌷🌸🌿☘
*********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: १४. संघाशी संघर्ष (ii)
*********************
No comments:
Post a Comment