पोस्ट नं 190

📚 पोस्ट नं 190 📖
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
विभाग तीन- धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे
Section III
Dhamma to be Saddhamma must promote Maitri
🌷3. जेव्हा धम्म 'करुणेपेक्षाही मैत्री अधिक महत्त्वाची आहे' असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरुप प्राप्त होते 🌷
Dhamma is Saddhamma only when it Teaches that More than Karuna what is Necessary is Maitri
***********************

1) भगवान बुद्ध केवळ करुणा शिकवून थांबले नाही.

2) करुणा म्हणजे प्राणिमात्रांसंबंधी दया. भगवान बुद्धांनी यापलीकडे जाऊन मैत्री शिकविली. "मैत्री म्हणजे अखिल जीव-जाती संबंधी प्रेम."

3) केवळ करुणेपर्यंत जाऊन न थांबता, पुढे जाऊन अखिल जीव-जातीवर प्रेम केले पाहिजे अशी बुद्धांची शिकवण आहे.

4) श्रावस्ती येथे राहत असताना एका सूत्रात तथागत बुद्धांनी हे चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे.

5) मैत्रीसंबंधी बोलताना तथागत बुद्ध भिक्खूंना म्हणाले,

6) "समजा, मनुष्य एक विहीर खणतो आहे. भूमी त्यामुळे रागावते काय?"

7) "नाही भगवान, नाही!" ते भिक्खू उत्तरले.

8). "समजा, एक मनुष्य लाख आणि रंग घेऊन हवेत चित्रे रंगवू लागला. तो चित्र रंगवू शकेल असे तुम्हांला वाटते काय?"

9) "नाही, भगवान!"

10) "कां नाही?"
भिक्खू म्हणाले, "कारण हवेत असे काळे फलक नाहीत की, ज्यावर रंग भरता येईल."

11) "त्याप्रमाणेच तुमच्या मनातही किल्मिष असता कामा नये. कारण किल्मिषे ही दुर्विचाराचीच प्रतिबिंब असतात."

12) "समजा, एखादा मनुष्य हातात पेटती मशाल घेऊन गंगेला आग लावण्यासाठी निघाला, तर त्याला आग लावता येईल काय?"

13) "नाही. नाही भगवान."

14) "कां नाही?"
"कारण गंगेच्या पाण्यात ज्वालाग्राहीपणा नाही."

15) आपले प्रवचन संपवित भगवंत म्हणाले, "ज्याप्रमाणे भूमीला इजा झाल्यासारखे वाटत नाही आणि ती रागावत नाही, ज्याप्रमाणे हवा आपल्यावर कसलीच प्रतिक्रिया होऊ देत नाही आणि ज्याप्रमाणे अग्नीने विचलित न होता गंगाजळ सारखे वाहत राहते, त्याप्रमाणे भिक्खूंनो, तुम्ही दुसऱ्याने केलेला अपमान आणि अन्याय सहन करून त्याच्याशी मैत्रीनेच वागत राहिले पाहिजे."

16) "भिक्खूंनो! मैत्री ही सतत आणि अप्रतिहत वाहत राहिली पाहिजे. आपले मन पृथ्वीसारखे खंबीर, हवेसारखे विमल आणि गंगेसारखे गंभीर ठेवणे हे तुमचे पवित्र कर्तव्य आहे. असे जर तुम्ही कराल तर कितीही दुःसह गोष्ट घडली तरी तुम्ही सहसा विचलित होणार नाही. कारण जे कोणी उपद्रव देतात ते शेवटी दमून जातात."

17) "तुमच्या मैत्रीचा परिसर विश्वासासारखा अमर्याद असावा, तुमचे विचार भव्य आणि अपार असावेत आणि त्यात द्वेषाचा लवलेश नसावा."

18) "माझ्या धम्मानुसार केवळ करुणेने वागणे हे पुरेसे नाही; त्यात मैत्रीने वागणे आवश्यक आहे."

19) या प्रवचनात भगवंतानी भिक्खूंना एक कथा सांगितली ती संस्मरणीय आहे.

20) पूर्वी एकदा श्रावस्ती नगरात विदेशिका नावाची एक कुलीन स्त्री राहत असे. ती सभ्यता, लीनता आणि सौम्यता या गुणांबद्दल प्रसिद्ध होती. तिची एक मोलकरीण होती. तिचे नाव काली. मोठी चलाख, सकाळी लवकर उठणारी आणि कामसू अशी मुलगी होती ती. कालीने स्वतःशी विचार केला, "माझ्या मालकिणीची ख्याती आहे की, तिला क्रोध असा येतच नाही; किंवा तो ती प्रकट करीत नाही, किंवा कदाचित मी आपले काम इतक्या चोखपणे बजावते म्हणून तिचा क्रोध अप्रकट राहात असावा. मी तिला कसोटी लावून पाहते."

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
३. जेव्हा धम्म 'करुणेपेक्षाही मैत्री अधिक महत्त्वाची आहे' असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरुप प्राप्त होते. (ii)
*************************

No comments:

Post a Comment