

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
विभाग तीन- धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी त्याने मैत्रीला उत्तेजन दिले पाहिजे
Section III
Dhamma to be Saddhamma must promote Maitri


Dhamma is Saddhamma only when it Teaches that besides Pradnya and Sila what is Necessary is Karuna
***********************
1) बुद्ध धम्माचे अधिष्ठान (foundation) काय? यासंबंधी काही अंशी मतभिन्नता आहे.
2) प्रज्ञा हीच केवळ बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे की, करुणा हीच त्यांच्या धम्माचे अधिष्ठान आहे.
3) या वादामुळे बुद्धानुयायांत दोन शाखा उत्पन्न झाल्या. एक शाखा म्हणते की प्रज्ञा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे. दुसरी शाखा म्हणते की करुणा हीच बुद्ध धम्माचे अधिष्ठान आहे.
4) ह्या दोन्ही शाखा अद्यापही एकमेकांपासून विभक्त झालेल्या आहेत.
5) भगवान बुद्धांच्या शब्दांची कसोटी ह्या दोन्हीही शाखांना लावली असता त्या दोन्हीही शाखा चुकीच्या वाटतात.
6) प्रज्ञा ही बुद्ध धम्माचा एक आधारस्तंभ आहे, याबद्दल मतभेद नाही.
7) वाद आहे तो हा की, करुणासुद्धा भगवान बुद्धांच्या धम्माची आधारस्तंभ आहे काय?
8). करुणा ही त्यांच्या धम्माची आधारस्तंभ आहे हे संशयातीत आहे.
9) याचे समर्थन बुद्धवचनानेच करता येईल.
10) पूर्वी गांधार नावाच्या देशात भयानक रोगाने पछाडलेला एक वृद्ध भिक्खू होता. तो ज्या ज्या ठिकाणी उठत अथवा बसत असे ती जागा मलिन होई.
11) तो गांधार देशातील एका विहारात राहात असे. कोणीही त्याच्याजवळ जात नसे किंवा त्याला संकटात साहाय्य करीत नसे.
12) एकदा भगवान बुद्ध आपल्या अनुयायांसह तेथे गेले आणि आवश्यक पाने, भांडी, गरम पाणी घेऊन, तो म्हातारा भिक्खू पडलेला होता त्या ठिकाणी सर्व भिक्खूंसह येऊन पोहचले.
13) त्या जागेला एवढी दुर्गंधी येत होती की, त्या सर्व भिक्खूंना त्या माणसासंबंधी घृणा वाटू लागली. परंतु तथागतांनी शुक्रदेवाला गरम पाणी ओतायला सांगून आपल्या स्वतःच्या हाताने त्या भिक्खूचे शरीर धुण्यास आणि त्याच्या रोगावर उपचार करण्यास प्रारंभ केला.
14) असे म्हणतात की, तेव्हा धरणीकंप झाला आणि ते स्थान एका दिव्य प्रकाशाने इतके भरून गेले की, राजा, त्याचे प्रधान, देव आणि नाग लोक तेथे सत्वर धावत आले आणि तथागतांची पूजा करू लागले.
15) तथागताला उद्देशून त्यांनी विचारले, "इतक्या थोर, उदात्त, महापुरुषाने असले घाणेरडे काम का करावे?" यावर भगवान बुद्धाने आपल्या कृतीचे असे स्पष्टीकरण केले:
16) "या जगात जे गरीब आहेत, असहाय्य आणि अनाथ आहेत त्यांचा तथागत मित्र आहे. जे शारिरीक व्याधींनी पछाडलेले आहेत, मग ते श्रमण असोत अथवा इतर कोणीही असोत त्यांची सेवा करण्यासाठी, जे दरिद्री, अरक्षित आणि वृद्ध आहेत त्यांना सहाय्य करण्यासाठी आणि इतरांना आपल्यासारखेच करायला प्रेरणा देण्यासाठी तथागतांचा जन्म आहे."
"The purpose of Tathagata in coming into the world, is to befriend those poor and helpless and unprotected, to nourish those in bodily affliction, whether they be Samanas or men of any other religion; to help the impoverished, the orphan, and the aged, and to persuade others so to do."
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
३. जेव्हा धम्म 'करुणेपेक्षाही मैत्री अधिक महत्त्वाची आहे' असे शिकवतो, तेव्हा त्याला सद्धम्मरुप प्राप्त होते.
*************************
No comments:
Post a Comment