

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
विभाग एक- सद्धम्माची कार्ये


To make the World a Kingdom of Righteousness
************************
1) धम्माचे प्रयोजन काय?
2) याची भिन्न धर्मांनी भिन्न भिन्न उत्तरे दिली आहेत.
3) माणसाला ईश्वरप्राप्तीच्या मार्गी लावून त्याला आपल्या आत्म्याच्या मोक्षाचे महत्त्व शिकविणे, हे सामान्यतः वरील प्रश्नाला उत्तर येते.
4) बहुतेक धर्म तीन प्रकारच्या राज्यासंबंधी बोलतात.
5) एकाला स्वर्गाचे राज्य म्हणतात, दुसऱ्याला पृथ्वीवरील (इहलोकीचे) राज्य म्हणतात आणि तिसऱ्याला नरकाचे राज्य म्हणतात.
6) असे म्हणतात की, स्वर्ग-राज्यात देवांचे शासन चालते. नरक-राज्यात दुष्टांचे राज्य चालते. इहलोकीच्या राज्यासंबंधी वाद आहेत. ते सैतानाच्या मांडलिकत्वाखाली नसते, त्याप्रमाणेच देवांचे सार्वभौमत्वही त्यावर पसरलेले नसते. एक दिवस ते पसरेल, अशी अपेक्षा मात्र असते.
7) काही धर्मांमध्ये स्वर्गराज्य प्रत्यक्ष ईश्वराच्या शासनाखाली असल्याने तेथे सदाचाराचे धर्मराज्य असते.
8). इतर काही धर्मांत स्वर्गराज्य हे पृथ्वीवर असत नाही. ते फक्त स्वर्गाचेच दुसरे नाव आहे. जो कोणी ईश्वर आणि त्याच्या प्रेषितावर श्रद्धा ठेवील त्यालाच तेथे पोहचता येते. स्वर्गलोकी पोहचल्यावर त्या धर्मनिष्ठांना जीवनातील सर्व भोगविलास तेथे लाभतात.
9) सर्व धर्म असे उपदेशितात की, ह्या स्वर्गराज्याची प्राप्ती हे प्रत्येक माणसाचे साध्य असावे; आणि ते कसे साधावे हे सांगणे त्या सर्व धर्माचे कार्य असावे.
10) "धर्माचा उद्देश काय?" या प्रश्नाला तथागतांचे उत्तर अगदी वेगळे होते.
11) जीवनाचा उद्देश काही तरी काल्पनिक स्वर्गाची प्राप्ती आहे, असे त्यांनी लोकांना सांगितले नाही. त्यांचे म्हणणे असे की, धर्माचे, सदाचाराचे राज्य पृथ्वीवरच आहे आणि त्याची प्राप्ती उत्तम आचरणानेच घडते.(Righteous Conduct)
12) त्यांनी असे सांगितले आहे की, "दुःख निराकरणासाठी प्रत्येक माणसाने दुसऱ्या प्रत्येक माणसाशी सदाचारानेच वागले पाहिजे; आणि अशा व्यवहारानेच पृथ्वीवर नीतीमान राज्य (Kingdom of Righteousness) स्थापन केले पाहिजे."
13) यामुळेच त्यांचा धर्म इतर धर्मापासून वेगळा पडतो.
14) त्यांचा धर्म *पंचशील, अष्टांगमार्ग आणि पारमिता* यांवर भर देतो.
15) तथागत बुद्धांनी या त्रयीवरच आपला धर्म का आधारला? कारण जीवन-मार्गाचे हे तीन घटक असून त्यांच्या योगानेच मनुष्य सदाचारी बनू शकतो.
16) माणसाचे दुःख हे माणसा-माणसातील अनुचित व्यवहाराचाच परिणाम आहे.
17) हा अनुचित व्यवहार आणि त्यापासून उद्भवणारी दुःखे ही नीतीमानता व सदाचरण (Righteousness) यांनीच नाहीशी होऊ शकतात.
18) म्हणूनच धर्माने नुसता उपदेश करून भागणार नाही. तर त्याने माणसाला आपल्या व्यवहारात सदाचाराची किती आवश्यकता आहे, हे त्याच्या मनावर पूर्णपणे ठसविले पाहिजे.
19) ही सदाचाराची आवश्यकता माणसाच्या मनावर ठसविण्यासाठी धर्माला इतरही काही कार्ये करावी लागतात, असे ते म्हणतात.
20) धर्माने माणसाला आचरण्यास योग्य कुशल कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि त्याआधारे आचरण करण्याचे शिकविले पाहिजे. (To follow what is right.)
21) धर्माने आचरण्यास अयोग्य (अकुशल) कर्म कोणते हे ओळखण्याचे आणि ते टाळण्याचे शिकविले पाहिजे. (Not to follow what is wrong.)
22) ह्याशिवाय अतिशय महत्त्वपूर्ण असे मानलेले धम्माचे दोन उपदेश तथागतांनी शिकविले.
*************************
For English: See the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. जग हे धम्मराज्य बनविणे (ii)
*************************
No comments:
Post a Comment