पोस्ट नं 173

📚 पोस्ट नं 173 📖
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?
🌷5. यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा धम्म नाही 🌷
Belief in Soul is not Dhamma
************************
*(१)*

1) ब्राम्हणी धर्म हा यज्ञावर आधारलेला होता.

2) काही यज्ञांना नित्य यज्ञ म्हणत. काहींना नैमित्तिक.

3) नित्य यज्ञ हे अनिवार्य कर्तव्य होते आणि त्यापासून फळ मिळो किंवा न मिळो, ते करणे आवश्यक होते.

4) नैमित्तिक यज्ञ हे याजक संसारिकाच्या काही इच्छापूर्तीसाठी केले जात.

5) ब्राम्हणी यज्ञात सुरापान, पशूबलिदान आणि स्वच्छंद आचरण घडत असे.

6) तरीसुद्धा हे यज्ञ धार्मिक कृत्ये समजली जात.

7) अशा यज्ञांवर आधारलेल्या धर्माला तथागतांनी मान्यता दिली नाही.

8). जे अनेक ब्राम्हण भगवान बुद्धांजवळ 'यज्ञ हा धर्माचे अंग नव्हे,' या त्यांच्या मताबद्दल वाद घालण्यासाठी जात, त्यांना भगवान बुद्धाने आपल्या मताची आधारभूत कारणे सांगितलेली आहेत.

9) असे लिहिलेले आहे की, तीन ब्राम्हणांनी त्यांच्याशी वाद केला.

10) ते तीन ब्राम्हण म्हणजे– कूटदंत, उज्जय आणि उदायी.

11) कूटदंत ब्राम्हणाने भगवान बुद्धाला यज्ञाबाबत त्यांची मते विचारली.

12) तथागत बोलले, "ठीक आहे, ब्राम्हणा, मी बोलतो ते सावधान चित्ताने ऐक."

13) कूटदंत उतरला, 'ठीक आहे' आणि तथागत खालीलप्रमाणे बोलले.

14) "हे ब्राम्हणा, फार प्राचीन काळी महाविजेता नावाचा एक पराक्रमी, धनसंपन्न राजा होऊन गेला. सोने, रुपे, उपभोगाच्या वस्तू, धान्य आणि इतर माल, याने त्याची भांडारे आणि कोठारे भरून गेलेली होती."

15) "एकदा राजा महाविजेता एकटाच विचारमग्न होऊन बसला होता. त्याच्या मनात एक प्रबळ विचार आला, माणसाच्या सुखोपभोगाला लागणाऱ्या सर्व सामानाची माझ्याजवळ समृध्दी आहे. मी पृथ्वीचा चक्रवर्ती राजा आहे. जर मी महायज्ञ करून माझे दीर्घकाळ कल्याण निश्चित केले तर ठीक होईल."

16) "तेव्हा त्या राजाचा पुरोहित ब्राम्हण राजाला म्हणाला, 'राजन', या समयी आपली प्रजा अगदी हैराण आहे, लुटली जात आहे, डाकू नगरातून लुटमार करीत फिरत आहेत आणि त्यामुळे सर्व रस्ते असुरक्षित आहेत. जोपर्यंत अशी अवस्था आहे तोपर्यंत महाराजांनी प्रजेवर यज्ञासाठी कर लागू केला तर ती खरोखर वाईट गोष्ट होईल."

17) "परंतु महाराजांनी जर असा विचार केला की, 'मी तात्काळ या दुष्ट लोकांच्या सर्व कारवाया थांबवीन, त्यांना पकडून हद्दपार करीन, त्यांना दंड करीन, त्यांना शिक्षा करीन, त्यांना देहांत शासन करीन.' तर या रीतीने या लोकांचा स्वेच्छाचार समाधानकारक रीतीने थांबविता येणार नाही. जे शिक्षा केल्याविना मागे राहातील ते प्रजेला हैराण केल्याशिवाय सोडणार नाहीत."

18) "ही दुरावस्था थांबविण्याचा एक मार्ग आहे तो असा. आपल्या राज्यात जो कोणी गुरे-ढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे, शेती पेरण्याला बी-बियाणे द्यावे. आपल्या राज्यांत जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे."

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
५. यज्ञयागावर विश्वास ठेवणे हा धम्म नाही (ii)
*************************

No comments:

Post a Comment