पोस्ट नं 164

📚 पोस्ट नं 164 📖
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?
🌷2. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे 🌷
Belief in Ishwara (God) is Not Essentially Part of Dhamma
************************

1) हे जग कोणी निर्माण केले? हा एक सर्वसामान्य प्रश्न आहे. हे जग ईश्वराने निर्माण केले हे त्याला एक सर्वसामान्य उत्तर आहे.

2) ब्राम्हणीय योजनेत या ईश्वराला प्रजापती, ईश्वर, ब्रम्ह, महाब्रम्ह इत्यादी नावे आहेत.

3) हा ईश्वर कोण आहे आणि तो कसा अस्तित्वात आला या प्रश्नाला तेथे उत्तर नाही.

4) जे लोक ईश्वरावर विश्वास ठेवतात ते त्याचे वर्णन सर्वशक्तीमान, सर्वव्यापक आणि सर्वज्ञ म्हणजे जो सर्वकाही जाणतो, असे करतात.

5) ईश्वराच्या ठिकाणी काही नैतिक गुण असल्याचेही सांगतात. असे म्हणतात की ईश्वर न्यायी, आणि दयाळू आहे.

6) तथागत बुद्धांनी ईश्वराचा सृष्टीकर्ता म्हणून स्वीकार केला आहे काय असा प्रश्न आहे.

7) उत्तर आहे "नाही." त्यांनी स्वीकार केलेला नाही.

8). अशी अनेक कारणे आहेत की ज्यासाठी त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत मान्य केला नाही.

9) कोणीही ईश्वराला पाहिलेले नाही. लोक फक्त ईश्वरासंबंधी बोलतात.

10) ईश्वर अज्ञात आणि अदृश्य आहे.

11) कोणीही असे सिद्ध करु शकत नाही की ईश्वराने हे सर्व जग रचले. जग हे रचलेले नसून विकास पावलेले आहे. (The world has evolved and is not created.)

12) ईश्वरावर विश्वास ठेवण्यात काय लाभ आहे? काहीही लाभ नाही.

13) तथागत म्हणतात की ईश्वराधीन धर्म हे कल्पनाश्रीत धर्म आहेत. (a religion based on God is based on speculation.)

14) म्हणून ईश्वरावर आधारलेला धर्म हा काही उपयोगाचा नाही.

15) त्यांचा परिणाम म्हणून केवळ भ्रामक समजुती उत्पन्न होतात. (creating superstition)

16) तथागत बुद्धांनी हा प्रश्न येथेच सोडलेला नाही. त्यांनी या प्रश्नांच्या विविध पैलूंचा विचार केला आहे.

17) ज्या कारणास्तव त्यांनी ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत अमान्य केला आहे ती अनेक कारणे आहेत.

18) त्यांनी असा विचार मांडला आहे की ईश्वराच्या अस्तित्वाचा सिद्धांत हा सत्यावर आधारलेला नाही.

19) हा विचार त्यांनी वासेट्ठ आणि भारद्वाज या दोन ब्राम्हणांबरोबर केलेल्या संभाषणात स्पष्ट केलेला आहे.

20) वासेट्ठ आणि भारद्वाज या दोघांमध्ये मुक्तीचा सत्य मार्ग कोणता व असत्य मार्ग कोणता यासंबंधी विवाद उत्पन्न झाला.

21) या समयी तथागत आपल्या महान भिक्खुसंघासमवेत कोशल जनपदामध्ये विहार करीत होते. तेथे मनसाकट नावाच्या ब्राम्हणगावी अकिरवती नदीच्या तटावरील एका आम्रवनात ते थांबले होते.

*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
२. ईश्वरावर विश्वास हे धम्माचे आवश्यक अंग नव्हे (ii)
*************************

No comments:

Post a Comment