पोस्ट नं 160

📚 पोस्ट नं 160 📖
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
Part III- What is Dhamma?
🌷5. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म 🌷
To believe that all compound things are impermanent is Dhamma
**************************

1) अनित्यतेच्या सिद्धांताला तीन पैलू आहेत.

2) *अनेक तत्त्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत.*
(Impermanence of composite things.)

3) व्यक्तीगत रूपाने प्राणी अनित्य आहे.
(Impermanence of individual being)

4) *प्रतीत्य समुत्पन्न वस्तूचे आत्मतत्त्व अनित्य आहे.*
(self nature of conditioned things)

5) अनेक तत्त्वे मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता *बौद्धतत्त्ववेत्ता असंग* याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केली आहे.

6) असंग म्हणतो, "सर्व वस्तू ह्या हेतू आणि प्रत्यय ह्यांमुळे उत्पन्न होतात. त्यांना त्यांचे असे अगदी स्वतंत्र अस्तित्व नसते. हेतू प्रत्ययांचा उच्छेद झाला की, वस्तूंचे अस्तित्व उरत नाही, त्यांचा अंत होतो."

7) *सजीव प्राण्याचे शरीर म्हणजे पृथ्वी, आप, तेज, आणि वायू: या चार महाभूतांचा परिणाम होय;* (earth, water, fire and air) आणि ह्या चार भूतांचे पृथक्करण झाले की हा प्राणी, प्राणी म्हणून उरत नाही.

8). अनेक तत्त्वे मिळून झालेली वस्तू अनित्य आहे ह्या वचनाचा अभिप्राय वरील प्रकारचा आहे.

9) सजीव प्राण्याच्या अनित्यतेचे वर्णन 'तो असणे म्हणजे, तो होत/ बनत असणे', *(Being is Becoming)* ह्या शब्दात करता येईल.

10) ह्या अर्थाने पाहिले असता, जो प्राणी भूतकाळात जीवन व्यतीत करीत होता तोच प्राणी वर्तमानकाळात असू शकत नाही. आणि तोच प्राणी भविष्यकाळात असू शकणार नाही. भविष्यकाळी जो प्राणी असेल तो पूर्वी नव्हता आणि तोच आजही नाही. वर्तमानकाळी जो प्राणी आहे तोच पूर्वी नव्हता आणि पुढेही तोच असणार नाही.

11) थोडक्यात सांगायचे म्हणजे *मनुष्यप्राणी हा परिवर्तनशील आणि संवर्धनशील आहे.* आपल्या जीवनाच्या कोणत्याही दोन क्षणी तो तोच असू शकत नाही.

12) अनित्यतेच्या सिद्धांताचा तिसरा पैलू सामान्य माणसाला समजायला कठीण आहे.

13) प्रत्येक सजीव प्राणी केव्हा ना केव्हा तरी मरणार हे समजायला सोपे आहे.

14) परंतु तो जिवंत असताना सारखा बदलत आहे किंवा बनत आहे हे समजावयास कठीण आहे.

15) हे परिवर्तन कसे शक्य आहे? याला भगवान बुद्धाचे उत्तर असे: *"सर्वच अनित्य असल्यामुळे हे शक्य आहे."*

16) ह्याच विचारसरणीतून पुढे शून्यवादाचा उदय झाला.

17) बौद्ध शून्यवाद म्हणजे पूर्णपणे अनास्तित्ववाद नव्हे. त्याचा अर्थ एवढाच की, *ह्या ऐहिक जगात प्रतिक्षणी परिवर्तन चालू आहे.*

18) शून्यतेमुळेच सर्व अस्तित्व शक्य होते ही गोष्ट फार थोड्यांच्या लक्षात येते. शून्यतेशिवाय काहीही शक्य झाले नसते. सर्व वस्तूंच्या स्वभावाच्या अनित्यतेवरच इतर दुसऱ्या वस्तूंचे अस्तित्व अवलंबून आहे.

19) *जर वस्तू सतत परिवर्तनशील नसत्या, नित्य व अपरिवर्तनशील असत्या, तर एका प्रकारापासून दुसऱ्या प्रकारात जीवनाचे जे उत्क्रमण आणि सजीव वस्तूंचा जो विकास चालला आहे त्याला विराम मिळाला असता.*

20) जर मनुष्यप्राणी मरणाधीन अथवा परिवर्तनशील नसता आणि एकाच स्थितीत तसाच राहिला असता, तर काय परिणाम झाला असता? असे झाले असते तर *मानवजातीची प्रगती खुंटली असती.*

21) शून्य म्हणजे अभाव असे मानले असते तर मोठीच अनवस्था उद्भवली असती.

22) परंतु तसे मानलेले नाही. *शून्य हा एक बिंदूसमान पदार्थ असून त्याला आशय आहे, परंतु त्याला लांबी रुंदी नाही.*

23) भगवान बुद्धाचा उपदेश असा की, *सर्व वस्तू अनित्य आहेत.*

24) बुद्धाच्या ह्या सिद्धांतापासून बोध काय घ्यावयाचा हा अति महत्वाचा प्रश्न आहे.

25) या अनित्यतेच्या सिद्धांतापासून असा बोध घ्यावयाचा की, *कोणत्याही वस्तूसंबंधी, व्यक्तीसंबंधी आसक्ती राखू नका.*

26) *लोकांनी मालमत्ता, मित्र इत्यादीसंबंधी अनासक्तीचा अभ्यास करण्यासाठीच भगवान बुद्धाने म्हटले की, सर्व वस्तू अनित्य आहेत.*

🌸☘🌸☘🌸
*************************
For English: See the link in comment section
🌷🌾🌸🌷🌸🌿🌷
*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
६. 'कर्म' हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म
*************************

No comments:

Post a Comment