

*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग तिसरा- धम्म म्हणजे काय?
Part III- What is Dhamma?


To Give up Craving is Dhamma
**************************
1) धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात, "सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे *आरोग्य* आणि सर्वात मौल्यवान धन म्हणजे *संतोष."*
"There is no greater benefit than health and there is nothing more valuable than the spirit of contentment."
2) या संतोषवृत्तीचा अर्थ दीनपणा किंवा परिस्थितीपुढील शरणागती हा नव्हे.
3) कारण तसा अर्थ करणे बुद्धांच्या इतर सर्व शिकवणुकींविरूद्ध आहे.
4) निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधीही म्हटलेले नाही.
5) *पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करु नये, असे बुद्धाने कधीही सांगितलेले नाही.*
6) *उलट ते ऐश्वर्याचे स्वागतच करतात.* दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा वीर्याने म्हणजे उत्साहपूर्वक प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा ते उपदेश करतात.
7) जेव्हा बुद्ध म्हणतात की, *संतोष हे सर्वश्रेष्ठ धन होय, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ एवढाच की, माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन होऊ नये.*
8) भिक्खू रठ्ठपाल म्हणतो, "माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की, ते मूर्खपणाने यत्किंचितही दान न करता केवळ धन जमविण्याच्या उद्योगात गर्क असतात; त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. ज्या राजांची राज्ये समुद्रापर्यंत पसरलेली असतात त्यांच्याकडे पाहावे तर ते आपले साम्राज्य समुद्रापलीकडे फैलावण्यासाठी सारखे धडपडत असतात. प्राप्त आहे त्यापेक्षा अधिक प्राप्त व्हावे अशी इच्छा करीत राजे आणि त्यांची प्रजा या पृथ्वीतलावरून नष्ट होते. पाहिजे होते ते मिळाले नाही या विचारातच त्यांचा देहत्याग घडतो. कामभोगाचे पुरेपूर माप कोणाच्याच पदरात पडत नाही."
9) *महानिदान सूक्तांत बुद्धांनी आनंदाला लोभ-संयमनाची महती सांगितली आहे;* (necessity of controlling greed) तेथे ते म्हणतात,
10) *"आनंद, लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते, आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळविण्याच्या इच्छेत पर्यवसान होते, आणि जेव्हा ही स्वामित्वाची इच्छा मिळविलेले हातातून निसटू द्यायचे नाही असा चिवटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते."*
11) "लोभ अथवा अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे."
12) "ही तृष्णा किंवा हा लोभ आक्षेपार्ह का समजायचा?" याचे कारण बुद्ध आनंदाला सांगतात ते असे की, *"पुष्कळच वाईट आणि दुष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो. मारामारी, आघात, झगडे, वादप्रतिवाद, भांडण, निंदा, असत्य ह्या सर्वांचे मूळ तृष्णा अथवा लोभ यांत आहे."*
13) वर्गकलहाचे हे यथातथ्य विश्लेषण आहे यात शंका नाही.
That this is the correct analysis of class struggle, there can be no doubt.
14) म्हणूनच भगवान बुद्धांनी *'लोभ आणि तृष्णा आपल्या काबूत ठेवली पाहिजे'* या शिकवणुकीवर भर दिला. (control of greed and craving)





*************************
For English: see the link in comment section







*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
५. सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म
*************************
No comments:
Post a Comment