

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy


Conversion of Ratthapala
*************************
16) म्हणून रट्ठपालाच्या आईवडिलांनी त्याच्या मित्रांना भेटून सगळी हकीकत सांगितली आणि त्यांनी आपल्या मुलाला जे सांगितले होते तेच आग्रहपूर्वक त्याला पुन्हा सांगण्यास त्यांनी त्या मित्रांना सांगितले.
17) त्याच्या मित्रांनी त्याला तीन वेळा विनंती केली. पण तो एक शब्दही बोलला नाही. तेव्हा त्याचे मित्र त्याच्या आईवडिलांकडे आले आणि म्हणाले, "तिथेच उघड्या जमिनीवर पडून तो सांगत आहे की, 'मी एक तर मरून जाईन, नाहीतर भिक्खू होईन. जर तुम्ही त्याला संमती दिली नाही तर तो कधीही जिवंत उठणार नाही.' पण तुम्ही संमती दिलीत तर तो भिक्खू झाल्यावर तुमच्या दृष्टीस तरी पडेल. जर भिक्खू होऊन राहाणे त्याला आवडले नाही तर तो दुसरे काय करू शकेल? तो येथेच परत येईल. म्हणून तुम्ही त्याला संमती द्या."
18) "ठीक आहे, आम्ही संमती देतो, पण जेव्हा तो भिक्खू होईल तेव्हा त्याने इथे येऊन आमची भेट घेतली पाहिजे."
19) रट्ठपालाचे मित्र त्याच्याकडे गेले आणि त्याच्या आईवडिलांनी संमती दिल्याचे त्यांनी त्याला सांगितले. परंतु तो भिक्खू झाल्यानंतर त्याने त्यांना भेटण्यासाठी आले पाहिजे हेही सांगितले.
20) तेव्हा तो उठला आणि थकवा दूर झाल्यावर तो तथागतांकडे गेला. त्यांना वंदन केल्यावर एका बाजूला बसून तो म्हणाला, "मी भिक्खू होण्याबद्दल आई-वडिलांची संमती मिळविली आहे, मला संघात प्रवेश द्यावा अशी भगवंतांना माझी विनंती आहे."
21) तथागतांच्या संघात त्याला प्रवेश देण्यात आला. थुल्लकोठ्ठित येथे आवश्यक तितके दिवस राहून पंधरवड्यानंतर भगवान बुद्ध भिक्षायात्रेसाठी श्रावस्तीस जावयास निघाले आणि त्या ठिकाणी अनाथपिंडकाच्या सुखदायी जेतवनात त्यांनी वस्ती केली.
22) ज्या आदर्शाच्या शोधासाठी तरुण लोक गृहत्याग करुन गृहहीन भिक्खू होतात तो उच्च प्रतीच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ आदर्श, भिक्खू रट्ठपालाला एकांतवास, कष्ट, दृढता व निःस्वार्थ यांनी परिपूर्ण असे जीवन जगल्यावर लवकरच मिळाला.
23) नंतर तो तथागतांकडे गेला आणि वंदन केल्यावर एका बाजूला बसून म्हणाला, "तथागतांच्या अनुज्ञेने आई-वडिलांना भेटावयास जाण्याची माझी इच्छा आहे."
24) रट्ठपालाच्या मनातील विचारांची आपल्या मनात बारकाईने तपासणी करून आणि आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा त्याग करून सामान्य माणसाचे साधारण पातळीवरील जीवन जगण्याची इच्छा त्याला होणार नाही हे ओळखून तथागतांनी त्याला केव्हाही जाण्याची अनुज्ञा दिली.
25) तेव्हा उठून अत्यंत आदराने तथागतांचा निरोप घेतल्यावर आपला बिछाना बाजूला ठेवून त्याने आपले चीवर व भिक्षापात्र घेतले आणि भिक्षा यात्रेसाठी तो थुल्लकोठ्ठित येथे गेला. त्या ठिकाणी त्याने कुरुराजाच्या मृगवनात वस्ती केली. (deer-park of the Kuru king)
********************
For English: see the link in comment section







*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
८. रट्ठपालाची धम्मदीक्षा (iii)
*********************
No comments:
Post a Comment