

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy


Conversion of King Pasenjit
*************************
13) "दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्याभोवती सर्वत्र उभे आहेत. आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल."
14) "मग अन्याय करण्यात काय फायदा आहे?"
15) "सर्व शहाणे लोक शारीरीक सुखोपभोगांची उपेक्षा करतात. ते कामवासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात."
16) "झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील? जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही. हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य, जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञानीच समजला पाहिजे."
17) "ज्याला हे ज्ञान झाले आहे, त्यालाच प्रज्ञा (true wisdom) प्राप्त होते. ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हेच एक जीवनाचे ध्येय असले पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय.
18) "सर्व पंथांची शिकवण याच्यावरच केंद्रित झाली पाहिजे; कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे."
19) "हे सत्य केवळ ऋषीमुनींच्यासाठी नाही. प्रत्येक मानव-प्राण्याशी त्याचा संबंध आहे. व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काहीही फरक नाही. ऋषींचीही अधोगती होऊ शकते, आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात."
20) "कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो. सगळे जग त्या भरतीत वाहून जाते. जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही. परंतु प्रज्ञा (wisdom) ही नौका आहे, आणि सखोल विचार, चिंतन (reflection) हे तिचे सुकाणू आहे. धम्म तुम्हाला असा संदेश देतो की, तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा."
21) "आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे, म्हणून आपण सत्कर्मेच करावीत."
22) "आपल्या हातून दुष्कृत्ये होऊ नयेत म्हणून आपण आपले विचार तपासून पाहू या. कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते."
23) "प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात. अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधिप्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात. सूज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो, म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील. तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील."
24) "सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा. ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार/चिंतन करा आणि जीवन चंचल आहे हे समजून घ्या."
25) "मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या. सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका, आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा. असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल."
26) भगवान बुद्धांची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठविली, आणि त्यांचा उपासक (lay disciple) होण्याचे त्यांना वचन दिले.
For English: see the link in comment section







*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
७. जीवकाची धम्मदीक्षा
*********************
No comments:
Post a Comment