

*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy


Conversion of Anathapindika
*************************
1) सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता. या देशात राजा प्रसेनजित् (Pasenjit) याचे राज्य होते. सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता. गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे.
2) भगवान बुद्ध राजगृह येथे असताना आपल्या काही खाजगी कामानिमित्त अनाथपिंडक तेथे आला होता. राजगृह येथील ज्या व्यापारी संघाच्या श्रेष्ठीशी त्याच्या बहिणीचा विवाह झाला होता त्याच्याकडेच तो उतरला होता.
3) तो आला त्या वेळी श्रेष्ठीकडे भगवान बुद्ध आणि त्यांचे भिक्खू यांच्यासाठी भोजनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयारी चालू असल्याचे त्याला आढळले, की येथे एखादा लग्नसंमारंभ असावा किंवा राजाला आमंत्रण देण्यात आले असावे असे त्याला वाटले.
4) वस्तुस्थिती समजल्यावर भगवान बुद्धांच्या दर्शनासाठी तो अत्यंत उत्सुक झाला आणि तथागतांस भेटण्यासाठी तो त्याच रात्री निघाला.
5) आणि तथागतांनी त्याच क्षणी त्याच्या ह्रदयातील शुद्ध भाव ओळखून दिलासादायक शब्दांनी आपुलकीने त्याचे स्वागत केले. आसनस्थ झाल्यावर अनाथपिंडकाने एखाद्या धार्मिक विषयावर प्रवचन ऐकण्याची इच्छा व्यक्त केली.
6) तथागतांनी त्याची इच्छा मान्य करून प्रश्न केला, "आपले जीवन कोण घडवितो? तो ईश्वर, वस्तुमात्राचा निर्माता आहे काय? जर तो निर्माता ईश्वर असता, तर सर्व प्राणिमात्रांना आपल्या निर्मात्याच्या सत्तेच्या अधीन राहून निमूटपणे त्याच्यापुढे नमावे लागले असते. कुंभाराच्या हाताने घडविलेल्या मडक्याप्रमाणे त्यांची स्थिती झाली असती. जर ईश्वराने जग निर्माण केलेले असते तर दुःख, आपत्ती किंवा पाप अशासारखी कोणतीच गोष्ट असायला नको होती. कारण चांगल्या आणि वाईट अशा दोन्हीही गोष्टींचा उद्भव त्याच्यापासूनच झाला पाहिजे. जर असे नसेल तर त्याच्याखेरीज दुसरे एखादे कारण असले पाहिजे आणि मग तो ईश्वर स्वयंभू (selfexistent one) असणे शक्य नाही. याप्रमाणे ईश्वरविषयक कल्पनांचा पाडाव होतो, हे तुमच्या लक्षात येईल."
7) "आणखी असे म्हटले जाते की, ब्रम्ह (the Absolute) हे जगत्कारण असू शकत नाही. बीपासून झाड होते त्याप्रमाणे आपल्या भोवतालच्या सर्व वस्तू कारणामुळे अस्तित्वात येतात. मग ब्रम्ह हे सर्वच वस्तूंचे सारखेच कारण कसे असू शकेल? जर ते सर्वव्यापी असेल तर निश्चितपणे ते त्यांचा निर्माता होऊ शकत नाही."
8 ) "आणखी असे म्हटले जाते की, आत्मा हा निर्माता आहे. पण जर आत्मा हा निर्माता असेल तर त्याने सर्व वस्तू सुखकर का केल्या नाहीत? दुःख आणि सुख ही वास्तविक सत्य होत. ती आत्म्याने निर्माण केलेली असणे कसे शक्य आहे?"
9) "दुसरे असे की, निर्माता असा कोणी नाही किंवा दैव असे काहीएक नाही, आणि कार्यकारणभावही नाही हे विधान तुम्ही मान्य केले तर आपली जीवने घडविण्याचा आणि साध्यानुसार साधने जुळवून घेण्याचे काय प्रयोजन?"
10) "म्हणून आमचे म्हणणे असे की, अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू या कारणाशिवाय अस्तित्वात आलेल्या नाहीत. ईश्वर, ब्रम्ह, आत्मा आणि कारणरहित असे दैव यांपैकी कोणीही निर्माता नाही; तर आपल्याच कृत्याचे बरेवाईट परिणाम होत असतात."
For English: see the link in comment section







*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
५. अनाथपिंडकाची धम्मदीक्षा (ii)
*********************
No comments:
Post a Comment