पोस्ट नं 102

📚 पोस्ट नं 102 📖 
🌷बुद्ध आणि त्यांचा धम्म~ ले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर🌷
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
🌷4. बिंबिसार राजाची धम्मदीक्षा 🌷
Conversion of Bimbisara
*************************

1) 'राजगृह' ही मगधराजा- सेनिय बिंबिसाराची राजधानी होती.

2) एवढ्या मोठ्या संख्येने जटिलांचे दीक्षान्तर झाल्याचे ऐकून शहरातील प्रत्येक जण भगवान बुद्धांविषयी चर्चा करू लागला.

3) अशा प्रकारे बिंबिसार राजाला भगवान बुद्ध शहरात आल्याचे कळले.

4) राजा बिंबिसाराने मनात विचार केला, "अत्यंत कर्मठ आणि दुराग्रही अशा जटिलांना दीक्षान्तर करावयास लावणे ही साधी गोष्ट नव्हे. निश्चित तो अर्हत आणि सम्यक् सम्बुद्धच असला पाहिजे. तो विद्धान, सद्वर्तनी, जगाचे संपूर्ण ज्ञान झालेला, यात्रिक लोकांना मार्गदर्शन करणारा सर्वश्रेष्ठ पुरुष, देव आणि मानवांचा गुरु असला पाहिजे. जे सत्य त्याला स्वतःला समजले आहे अशाच सत्याचा उपदेश तो करीत असला पाहिजे."

5) "ज्याचा आदि, मध्य आणि अंत कल्याणकारक आहे, ज्याचा आशय आणि शब्द हे दोन्ही अत्यंत सुंदर व अचूक आहेत, असाच धम्म तो शिकवीत असला पाहिजे. संपूर्ण निर्दोष, शुद्ध आणि पवित्र जीवनाचाच तो प्रसार करीत असला पाहिजे. त्याच्यासारख्या माणसाचे दर्शन घेणे योग्य होय."

6) म्हणून बिंबिसार राजा मगधातील द्वादश दशसहस्त्र (twelve myriads) ब्राम्हण आणि गृहस्थ यांच्यासह ज्या ठिकाणी भगवान बुद्ध होते तेथे गेला. बुद्धांच्या समोर जाऊन त्यांना अभिवादन करून तो त्यांच्याजवळ बसला. मगधातील ते बारा दशसहस्र ब्राम्हण आणि गृहस्थ यांच्यापैकी देखील काहींनी तथागतास आदराने वंदन केले आणि त्यांच्याजवळ बसले. काहींनी तथागतास कुशलक्षेम विचारून त्याच्याजवळ जाऊन विनम्रपणे बसले. काही जण हात जोडून तथागतापुढे बसले. काहींनी तथागतास आपले नाव आणि गोत्र सांगून ते त्याच्याजवळ बसले. काही जण काही एक न बोलता जवळ बसले.

7) मगधातील त्या बारा दशसहस्त्र ब्राम्हणांनी आणि गृहस्थांनी बुद्धांच्या बरोबर आलेल्या भिक्खूंमध्ये उरूवेला काश्यपाला पाहिले. त्यांच्या मनात विचार आला, "हे कसे काय? हा थोर श्रमण उरुवेला काश्यपाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन अनुसरत आहे, की उरुवेला काश्यप ह्या थोर श्रमणाचे अनुयायित्व पत्करून पवित्र जीवन जगत आहे?"

8) त्या सर्वांच्या मनात उद्भभवलेला प्रश्न जाणून तथागत उरुवेला काश्यपाला म्हणाले, "हे उरुवेलवासी, तुला लोक महापुरुष म्हणतात. तुला असे काय आढळले की ज्यामुळे तू अग्नी-पूजा सोडून दिलीस? अग्नीहोत्राचा त्याग केलास, हे कसे काय घडले?"

9) काश्यपाने उत्तर दिले, "रूप, शब्द आणि रस यांनी युक्त असे पदार्थ आणि वासनापूर्ती, या वस्तूंचीच यज्ञयागापासून प्राप्ती होऊ शकते. या गोष्टी अशुद्ध आहेत, हे मला समजल्यामुळेच मला यज्ञयाग आणि आहुती यांत गोडी वाटली नाही."

10) "पण तुमची हरकत नसेल तर हा विचार तुमच्या मनामध्ये कशामुळे आला ते सांगा."

🌿🌸🌷🌸🌿☘🌷
*****************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
४. बिंबिसार राजाची धम्मदीक्षा (ii)
*********************

No comments:

Post a Comment